सुखद! हिर्लोक पंचक्रोशीवासीयांचा अंधार होणार कायमचाच दूर कुडाळ (सिंधुदुर्ग) - वेताळबांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील हिर्लोक पंचक्रोशीतील पावसाळ्यात अंधारात असणारी गावे आता कायमची उजळणार आहेत. आमदार वैभव नाईक व जिल्हा परिषद शिवसेना गटनेते नागेंद्र परब यांच्या पाठपुराव्यानंतर कायमस्वरूपी उपाय म्हणून माणगाव येथून आलेली 11 केव्हीची विद्युत वाहिनी घावनळे ते हिर्लोकला जोडण्यासाठी मंजुरी मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.  सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या हिर्लोक पंचक्रोशीत रांगणा तुळसुली, किनळोस हिर्लोक, नारूर, गिरगाव, कुसगाव या गावांत वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिन्या कडावल येथून डिगसच्या जंगल भागातून येत असल्यामुळे वीज खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत होते. पावसाळ्यात तर या गावांत कायमच चार चार दिवस वीज गायब होते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह जनमानसावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे तेथील ग्रामस्थांनी वीजेबाबतची समस्या कायमच श्री. परब यांच्याकडे व्यक्त केली होती. मागच्या जूनमध्ये मुसळधार पावसामुळे या भागात आठ दिवस वीजपुरवठा खंडित झाला होता. सर्व गावे अंधारात होती. संतप्त ग्रामस्थांनी आमदार नाईक व श्री. परब याच्या नेतृत्वाखाली राज्य विद्युत महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्री. पाटील यांची सर्व कार्यकर्त्यांसमावेत भेट घेतली होती. यावेळी श्री. परब यांनी हिर्लोक पंचक्रोशीची ही विजेची समस्या आक्रमकपणे मांडल्यानंतर श्री. पाटील यांनी ती तातडीने सोडविण्याचे मान्य केले. याकडे श्री. परब यांनी विद्युत वितरण कंपनीकडे सततचा पाठपुरावा केल्यानंतर त्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून माणगावातून आलेली 11 केव्हीची विद्युत वाहिनी घावनळे ते हिर्लोकला जोडण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. या विद्युत वाहिनीमुळे रांगणातुळसुली, हिर्लोक, किनळोस, नारूर, गिरगाव व कुसगाव ही सर्व गावे कायमची उजळणार आहेत.  विजेचा प्रश्‍न सुटणार  मंगळवारी (ता.14) विद्युत वाहिनी मार्गाची श्री. परब यांनी विद्युत महावितरणचे श्री. सावंत व अन्य कर्मचारी, ठेकेदार कंपनीचे हर्षित यांच्या समवेत पाहणी करून सर्व्हे केला. यावेळी रांगणा तुळसुली सरपंच नागेश आईर, हिर्लोक उपसरपंच नरेंद्र राणे, कुडाळ तालुका आत्मा कमिटी सदस्य बाजीराव झेंडे उपस्थित होते. त्यांनीही याबाबत सूचना मांडल्या व आवश्‍यक माहिती दिली. श्री. सावंत यांनी 15 दिवसांत हे काम पूर्ण करून लोकांच्या सेवेत रुजू करू, असा शब्द उपस्थितांना दिला.  संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, July 17, 2020

सुखद! हिर्लोक पंचक्रोशीवासीयांचा अंधार होणार कायमचाच दूर कुडाळ (सिंधुदुर्ग) - वेताळबांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील हिर्लोक पंचक्रोशीतील पावसाळ्यात अंधारात असणारी गावे आता कायमची उजळणार आहेत. आमदार वैभव नाईक व जिल्हा परिषद शिवसेना गटनेते नागेंद्र परब यांच्या पाठपुराव्यानंतर कायमस्वरूपी उपाय म्हणून माणगाव येथून आलेली 11 केव्हीची विद्युत वाहिनी घावनळे ते हिर्लोकला जोडण्यासाठी मंजुरी मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.  सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या हिर्लोक पंचक्रोशीत रांगणा तुळसुली, किनळोस हिर्लोक, नारूर, गिरगाव, कुसगाव या गावांत वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिन्या कडावल येथून डिगसच्या जंगल भागातून येत असल्यामुळे वीज खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत होते. पावसाळ्यात तर या गावांत कायमच चार चार दिवस वीज गायब होते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह जनमानसावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे तेथील ग्रामस्थांनी वीजेबाबतची समस्या कायमच श्री. परब यांच्याकडे व्यक्त केली होती. मागच्या जूनमध्ये मुसळधार पावसामुळे या भागात आठ दिवस वीजपुरवठा खंडित झाला होता. सर्व गावे अंधारात होती. संतप्त ग्रामस्थांनी आमदार नाईक व श्री. परब याच्या नेतृत्वाखाली राज्य विद्युत महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्री. पाटील यांची सर्व कार्यकर्त्यांसमावेत भेट घेतली होती. यावेळी श्री. परब यांनी हिर्लोक पंचक्रोशीची ही विजेची समस्या आक्रमकपणे मांडल्यानंतर श्री. पाटील यांनी ती तातडीने सोडविण्याचे मान्य केले. याकडे श्री. परब यांनी विद्युत वितरण कंपनीकडे सततचा पाठपुरावा केल्यानंतर त्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून माणगावातून आलेली 11 केव्हीची विद्युत वाहिनी घावनळे ते हिर्लोकला जोडण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. या विद्युत वाहिनीमुळे रांगणातुळसुली, हिर्लोक, किनळोस, नारूर, गिरगाव व कुसगाव ही सर्व गावे कायमची उजळणार आहेत.  विजेचा प्रश्‍न सुटणार  मंगळवारी (ता.14) विद्युत वाहिनी मार्गाची श्री. परब यांनी विद्युत महावितरणचे श्री. सावंत व अन्य कर्मचारी, ठेकेदार कंपनीचे हर्षित यांच्या समवेत पाहणी करून सर्व्हे केला. यावेळी रांगणा तुळसुली सरपंच नागेश आईर, हिर्लोक उपसरपंच नरेंद्र राणे, कुडाळ तालुका आत्मा कमिटी सदस्य बाजीराव झेंडे उपस्थित होते. त्यांनीही याबाबत सूचना मांडल्या व आवश्‍यक माहिती दिली. श्री. सावंत यांनी 15 दिवसांत हे काम पूर्ण करून लोकांच्या सेवेत रुजू करू, असा शब्द उपस्थितांना दिला.  संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2CdPItr

No comments:

Post a Comment