अनाथ मुलांची कोरोनामुळे दयनीय अवस्था होणार  नवी दिल्ली - रस्त्याकडेला भीक मागून जगणाऱ्या मुलांची कोरोनामुळे उपासमार होत आहे. सिग्नल, रेल्वे स्टेशन या ठिकाणी एखाद्या मुलाला शंभर ते दोनशे रुपये मिळत असत; त्या ठिकाणी गेल्या तीन महिन्यांत त्यांना दिवसाला पंधरा ते वीसच रुपये मिळविता आले. अशी मुले कर्ज घेऊन आपले जगणे रेटत आहेत. मात्र, त्यामुळे वेठबिगारी वाढण्याची शक्‍यता या मुलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    ‘सेव्ह द चिल्ड्रन’, ‘चेतना’, कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन यांनी रस्त्यावर राहणाऱ्या मुलांविषयी चिंता व्यक्त करताना हे निरीक्षण नोंदविले आहे. आत्तापर्यंत रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी बालकामगार, वेठबिगार यांच्या सक्षमीकरणासाठी मोठी कामे झाली. त्यामुळे एक अपेक्षित मदतयंत्रणा उभारता आली आहे. पण, हे सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरण्याची शक्‍यता कोरोनाच्या उद्रेकाने निर्माण केली आहे, असे मत ‘सेव्ह द चिल्ड्रन’ संस्थेचे कार्यक्रम संचालक आनंदित रॉय चौधरी यांनी व्यक्त केले आहे. लॉकडाउनदरम्यान ‘बचपन बचाओ’ आंदोलनाच्या माध्यमातून देशभरातील ३२८ मुलांची सुटका करून त्यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्यात आले. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मुलांना भीक न मिळाल्यामुळे काही जणांनी ओळखीच्या लोकांकडून तीन महिन्यांसाठी कर्ज घेतले आहे. त्याची परतफेड करण्यासाठी त्यांच्यापुढे वेठबिगार होण्याशिवाय पर्याय नाही, अशी माहिती चेतना संस्थेचे संजय गुप्ता  यांनी दिली.  लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात अनेकांकडून जेवण आणि अन्य मदत मिळाली. मात्र, त्यानंतर मागील एक महिना आमच्यासाठी नरकासारखा झाला आहे, असे रस्त्यावरील अनाथ मुलांनी या संस्थांना सांगितले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, June 28, 2020

अनाथ मुलांची कोरोनामुळे दयनीय अवस्था होणार  नवी दिल्ली - रस्त्याकडेला भीक मागून जगणाऱ्या मुलांची कोरोनामुळे उपासमार होत आहे. सिग्नल, रेल्वे स्टेशन या ठिकाणी एखाद्या मुलाला शंभर ते दोनशे रुपये मिळत असत; त्या ठिकाणी गेल्या तीन महिन्यांत त्यांना दिवसाला पंधरा ते वीसच रुपये मिळविता आले. अशी मुले कर्ज घेऊन आपले जगणे रेटत आहेत. मात्र, त्यामुळे वेठबिगारी वाढण्याची शक्‍यता या मुलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    ‘सेव्ह द चिल्ड्रन’, ‘चेतना’, कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन यांनी रस्त्यावर राहणाऱ्या मुलांविषयी चिंता व्यक्त करताना हे निरीक्षण नोंदविले आहे. आत्तापर्यंत रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी बालकामगार, वेठबिगार यांच्या सक्षमीकरणासाठी मोठी कामे झाली. त्यामुळे एक अपेक्षित मदतयंत्रणा उभारता आली आहे. पण, हे सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरण्याची शक्‍यता कोरोनाच्या उद्रेकाने निर्माण केली आहे, असे मत ‘सेव्ह द चिल्ड्रन’ संस्थेचे कार्यक्रम संचालक आनंदित रॉय चौधरी यांनी व्यक्त केले आहे. लॉकडाउनदरम्यान ‘बचपन बचाओ’ आंदोलनाच्या माध्यमातून देशभरातील ३२८ मुलांची सुटका करून त्यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्यात आले. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मुलांना भीक न मिळाल्यामुळे काही जणांनी ओळखीच्या लोकांकडून तीन महिन्यांसाठी कर्ज घेतले आहे. त्याची परतफेड करण्यासाठी त्यांच्यापुढे वेठबिगार होण्याशिवाय पर्याय नाही, अशी माहिती चेतना संस्थेचे संजय गुप्ता  यांनी दिली.  लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात अनेकांकडून जेवण आणि अन्य मदत मिळाली. मात्र, त्यानंतर मागील एक महिना आमच्यासाठी नरकासारखा झाला आहे, असे रस्त्यावरील अनाथ मुलांनी या संस्थांना सांगितले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3eFKzIA

No comments:

Post a Comment