यंदा अवजारांशिवाय शेती? सिंधुदुर्गची स्थिती अशी... ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम सुरू झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या कृषी अवजारांसाठी प्रस्ताव केले आहेत; मात्र कृषी विभागाकडे प्राप्त तब्बल 6 हजार 166 प्रस्ताव प्रलंबित आहेत. सध्या शेती हंगाम सुरु झाला आहे; परंतु सुधारित कृषी अवजारांशिवाय यावर्षी जिल्ह्यातील एवढ्या शेतकऱ्यांना शेती करावी लागणार आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम सुरू झालेला असून आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुधारित कृषी अवजारांचा वापर करणे गरजेचे आहे. मागील पाच वर्षात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळावे. यासाठी सुधारित कृषि अवजारे वितरणावर भर देण्यात आला होता. जिल्ह्यातील शेतकाऱ्यांकडून मोठ्या संख्येने प्रस्ताव मागविले होते. या योजनेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे सुधारित कृषि अवजारे मिळण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रस्ताव तयार करण्यात आले होते.  तालुकानिहाय प्रस्ताव  सुधारित कृषि अवजारे मिळावीत यासाठी राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण या योजने अंतर्गत तब्बल 6 हजार 166 शेतकऱ्यांनी अर्ज कृषी विभागाकडे केले आहेत. यामध्ये सावंतवाडी 1 हजार 295, कुडाळ 1 हजार 200, वेंगुर्ले 295, दोडामार्ग 236, कणकवली 1 हजार 300, मालवण 578, देवगड 1 हजार आणि वैभववाडी 262 अशाप्रकारे तालुकानिहाय प्रस्तावांचा समावेश आहे.  सूचनांअभावी मंजूरी रखडली  शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून सुधारित कृषी अवजारांची फार आवश्‍यकता आहे; मात्र कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत जिल्हा कृषी विभागाला लक्षांक व मार्गदर्शक सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत शेतीची अवजारे मिळण्यास फारच अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे ही योजना रखडली आहे.  कृषी मंत्र्यांना निवेदन  जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांनी राज्याचे कृषीमंत्री दादा भूसे यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले की, आधुनिक कृषी अवजारे योजनेअंतर्गत रखडलेले हे प्रस्ताव मंजूर होऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी अवजारांचा पुरवठा व्हावा. यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजने बाबत मार्गदर्शक सूचना व लक्षांक लवकरात लवकर मिळावे. या योजनेअंतर्गत लक्षांक व मार्गदर्शक सूचना संबंधितांना मिळाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर कृषी अवजारे उपलब्ध होऊ शकतील.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, June 11, 2020

यंदा अवजारांशिवाय शेती? सिंधुदुर्गची स्थिती अशी... ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम सुरू झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या कृषी अवजारांसाठी प्रस्ताव केले आहेत; मात्र कृषी विभागाकडे प्राप्त तब्बल 6 हजार 166 प्रस्ताव प्रलंबित आहेत. सध्या शेती हंगाम सुरु झाला आहे; परंतु सुधारित कृषी अवजारांशिवाय यावर्षी जिल्ह्यातील एवढ्या शेतकऱ्यांना शेती करावी लागणार आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम सुरू झालेला असून आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुधारित कृषी अवजारांचा वापर करणे गरजेचे आहे. मागील पाच वर्षात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळावे. यासाठी सुधारित कृषि अवजारे वितरणावर भर देण्यात आला होता. जिल्ह्यातील शेतकाऱ्यांकडून मोठ्या संख्येने प्रस्ताव मागविले होते. या योजनेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे सुधारित कृषि अवजारे मिळण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रस्ताव तयार करण्यात आले होते.  तालुकानिहाय प्रस्ताव  सुधारित कृषि अवजारे मिळावीत यासाठी राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण या योजने अंतर्गत तब्बल 6 हजार 166 शेतकऱ्यांनी अर्ज कृषी विभागाकडे केले आहेत. यामध्ये सावंतवाडी 1 हजार 295, कुडाळ 1 हजार 200, वेंगुर्ले 295, दोडामार्ग 236, कणकवली 1 हजार 300, मालवण 578, देवगड 1 हजार आणि वैभववाडी 262 अशाप्रकारे तालुकानिहाय प्रस्तावांचा समावेश आहे.  सूचनांअभावी मंजूरी रखडली  शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून सुधारित कृषी अवजारांची फार आवश्‍यकता आहे; मात्र कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत जिल्हा कृषी विभागाला लक्षांक व मार्गदर्शक सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत शेतीची अवजारे मिळण्यास फारच अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे ही योजना रखडली आहे.  कृषी मंत्र्यांना निवेदन  जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांनी राज्याचे कृषीमंत्री दादा भूसे यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले की, आधुनिक कृषी अवजारे योजनेअंतर्गत रखडलेले हे प्रस्ताव मंजूर होऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी अवजारांचा पुरवठा व्हावा. यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजने बाबत मार्गदर्शक सूचना व लक्षांक लवकरात लवकर मिळावे. या योजनेअंतर्गत लक्षांक व मार्गदर्शक सूचना संबंधितांना मिळाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर कृषी अवजारे उपलब्ध होऊ शकतील.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2MRfLYV

No comments:

Post a Comment