‘कर्जमुक्ती’च्या तिसऱ्या यादीत ५४७० शेतकऱ्यांना लाभ उस्मानाबाद : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ५१९ गावांतील पाच हजार ४७० पात्र लाभार्थ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सध्या कोरोनामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, अशावेळी शासनाकडून कर्जमुक्ती योजनेची यादी प्रसिद्ध झाल्याने निश्‍चितपणे नागरिकांना चांगलाच आधार मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारने पहिल्याच अधिवेशनात महत्त्वाकांक्षी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार कर्जमाफी मिळालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या जवळपास ८८ हजारांच्या घरात आहे. घोषणा झाल्यानंतर काही दिवसांतच सरकारने पहिली यादी जाहीर केली. येथे क्लिक करा - हिंगोली @ ९१ : दोन दिवसांत ३८ कोरोनाबाधित प्रायोगिक तत्त्वावर या यादीत जिल्ह्यातील दोनच गावांतील मोजक्या शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यानंतर काही दिवसांतच प्रसिद्ध केलेल्या दुसऱ्या यादीत हजारो शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. आता तिसऱ्या यादीमध्ये पाच हजारांहून अधिक शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा समावेश असून, आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार ६६ हजार ७२७ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. २७ डिसेंबरला राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून, आतापर्यंत दोन याद्या प्रसिद्ध झाल्या. तर आता तिसरीही यादी जाहीर करण्यात आली आहे. आजपर्यंत ५४ हजार २८५ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली असून, त्यापैकी ५१ हजार ९७० शेतकऱ्यांच्या खात्यावर ३८४ कोटी ७९ लाख रक्कम जमा करण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया अत्यंत जलद गतीने होत आहे. शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक यांनी केले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, May 6, 2020

‘कर्जमुक्ती’च्या तिसऱ्या यादीत ५४७० शेतकऱ्यांना लाभ उस्मानाबाद : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ५१९ गावांतील पाच हजार ४७० पात्र लाभार्थ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सध्या कोरोनामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, अशावेळी शासनाकडून कर्जमुक्ती योजनेची यादी प्रसिद्ध झाल्याने निश्‍चितपणे नागरिकांना चांगलाच आधार मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारने पहिल्याच अधिवेशनात महत्त्वाकांक्षी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार कर्जमाफी मिळालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या जवळपास ८८ हजारांच्या घरात आहे. घोषणा झाल्यानंतर काही दिवसांतच सरकारने पहिली यादी जाहीर केली. येथे क्लिक करा - हिंगोली @ ९१ : दोन दिवसांत ३८ कोरोनाबाधित प्रायोगिक तत्त्वावर या यादीत जिल्ह्यातील दोनच गावांतील मोजक्या शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यानंतर काही दिवसांतच प्रसिद्ध केलेल्या दुसऱ्या यादीत हजारो शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. आता तिसऱ्या यादीमध्ये पाच हजारांहून अधिक शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा समावेश असून, आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार ६६ हजार ७२७ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. २७ डिसेंबरला राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून, आतापर्यंत दोन याद्या प्रसिद्ध झाल्या. तर आता तिसरीही यादी जाहीर करण्यात आली आहे. आजपर्यंत ५४ हजार २८५ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली असून, त्यापैकी ५१ हजार ९७० शेतकऱ्यांच्या खात्यावर ३८४ कोटी ७९ लाख रक्कम जमा करण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया अत्यंत जलद गतीने होत आहे. शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक यांनी केले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2WAh0A5

No comments:

Post a Comment