मामाचा गाव राहिला दूरच घरांमध्ये मुले वैतागली; ना शाळा, ना मोकळेपणाने खेळण्याची मुभा  पिंपरी - परीक्षा संपल्यानंतर उन्हाळ्याची सुटी म्हटले की लहानग्यांना वेध लागतात मामाच्या गावाला जायचे. मात्र, यंदा कोरोनामुळे सर्वच नियोजन कोलमडल्याने लहानग्यांसाठी मामाचा गाव आता दूरच राहिला आहे. ना शाळा, ना मामाचा गाव, यासह मोकळेपणाने खेळण्याची धमाल नसल्याने मागील दोन महिन्यांपासून घरातच बसून राहिलेल्या चिमुकल्यांचे चेहरे हिरमुसले आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन जाहीर करण्यात आला. गावी जाणे तर दूरच घराबाहेर पडण्यासही मनाई आहे. अत्यावश्‍यक सेवेव्यतिरिक्त इतर वाहतूक व्यवस्था ठप्प आहे. दरम्यान, अनेक वर्गांच्या परीक्षा रद्द झाल्या असून, त्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. शाळा कधी सुरू होणार याबाबतही अनिश्‍चितता आहे. त्यामुळे परीक्षा संपल्यानंतर गावाला जायचे व शाळा सुरू होण्यापूर्वी परतायचे याप्रकारचे केलेले नियोजन कोलमडले आहे.  आणखी वाचा - तुमची मुलं घरात इंटरनेटवर काय पाहतात बघा! अशीच परिस्थिती कामानिमित्त गावाहून शहरात आलेल्यांची झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिकनगरी असून, नोकरीनिमित्त राज्यासह परराज्यातील अनेकजण शहरात वास्तव्याला आले आहेत. वर्षानुवर्षे कुटुंबासह शहरात राहत असले तरी वर्षातून एकदा आपल्या मूळगावी जाण्याची त्यांना ओढ असते. गावी गेल्यानंतर आई-वडिलांसह कुटुंबीयांची विचारपूस केली जाते. संपूर्ण कुटुंबासह एकत्रित राहण्याचा आनंद वेगळाच असतो. यासह शेतीच्या कामांसह मित्रांच्या भेटी व्हायच्या. मात्र, यंदा लॉकडाउनमुळे गावात बाहेरील व्यक्तीला येण्यास मनाई असून, गावातूनही बाहेर पडता येत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अनेकांसाठी यंदाच्या वर्षी त्यांचा गाव दूरच राहिला असल्याचे दिसून येते.  आणखी वाचा - फुकट काम करा, नाही तर राजीनामा द्या; आयटी कर्मचाऱ्यांवर दबाव केवळ फोनवरूनच विचारपूस  धमाल, मस्ती करण्यासह हौस पूर्ण करून घेण्याचे लहानग्यांचे हक्काचे ठिकाण म्हणजे मामाचे गाव असते. त्यामुळे मामाच्या गावी जाण्याची नेहमीच आतुरता असते. तसेच लग्नानंतर सासरी जाणाऱ्या मुलीलाही माहेरची ओढ असते. मात्र, मुलांच्या शिक्षणामुळे माहेराला येणे शक्‍य होत नसल्याने उन्हाळ्याच्या सुटीची वाट पाहिली जाते. लाडक्‍या मुलीसह भाचे मंडळींचे लाड पुरविण्यासाठी मामा, मावशी, आजी, आजोबा अगोदरच तयारी करून ठेवतात. मात्र, यंदा या आनंदावर विरजण पडले आहे. केवळ फोनवरूनच एकमेकांची विचारपूस केली जात आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, May 16, 2020

मामाचा गाव राहिला दूरच घरांमध्ये मुले वैतागली; ना शाळा, ना मोकळेपणाने खेळण्याची मुभा  पिंपरी - परीक्षा संपल्यानंतर उन्हाळ्याची सुटी म्हटले की लहानग्यांना वेध लागतात मामाच्या गावाला जायचे. मात्र, यंदा कोरोनामुळे सर्वच नियोजन कोलमडल्याने लहानग्यांसाठी मामाचा गाव आता दूरच राहिला आहे. ना शाळा, ना मामाचा गाव, यासह मोकळेपणाने खेळण्याची धमाल नसल्याने मागील दोन महिन्यांपासून घरातच बसून राहिलेल्या चिमुकल्यांचे चेहरे हिरमुसले आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन जाहीर करण्यात आला. गावी जाणे तर दूरच घराबाहेर पडण्यासही मनाई आहे. अत्यावश्‍यक सेवेव्यतिरिक्त इतर वाहतूक व्यवस्था ठप्प आहे. दरम्यान, अनेक वर्गांच्या परीक्षा रद्द झाल्या असून, त्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. शाळा कधी सुरू होणार याबाबतही अनिश्‍चितता आहे. त्यामुळे परीक्षा संपल्यानंतर गावाला जायचे व शाळा सुरू होण्यापूर्वी परतायचे याप्रकारचे केलेले नियोजन कोलमडले आहे.  आणखी वाचा - तुमची मुलं घरात इंटरनेटवर काय पाहतात बघा! अशीच परिस्थिती कामानिमित्त गावाहून शहरात आलेल्यांची झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिकनगरी असून, नोकरीनिमित्त राज्यासह परराज्यातील अनेकजण शहरात वास्तव्याला आले आहेत. वर्षानुवर्षे कुटुंबासह शहरात राहत असले तरी वर्षातून एकदा आपल्या मूळगावी जाण्याची त्यांना ओढ असते. गावी गेल्यानंतर आई-वडिलांसह कुटुंबीयांची विचारपूस केली जाते. संपूर्ण कुटुंबासह एकत्रित राहण्याचा आनंद वेगळाच असतो. यासह शेतीच्या कामांसह मित्रांच्या भेटी व्हायच्या. मात्र, यंदा लॉकडाउनमुळे गावात बाहेरील व्यक्तीला येण्यास मनाई असून, गावातूनही बाहेर पडता येत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अनेकांसाठी यंदाच्या वर्षी त्यांचा गाव दूरच राहिला असल्याचे दिसून येते.  आणखी वाचा - फुकट काम करा, नाही तर राजीनामा द्या; आयटी कर्मचाऱ्यांवर दबाव केवळ फोनवरूनच विचारपूस  धमाल, मस्ती करण्यासह हौस पूर्ण करून घेण्याचे लहानग्यांचे हक्काचे ठिकाण म्हणजे मामाचे गाव असते. त्यामुळे मामाच्या गावी जाण्याची नेहमीच आतुरता असते. तसेच लग्नानंतर सासरी जाणाऱ्या मुलीलाही माहेरची ओढ असते. मात्र, मुलांच्या शिक्षणामुळे माहेराला येणे शक्‍य होत नसल्याने उन्हाळ्याच्या सुटीची वाट पाहिली जाते. लाडक्‍या मुलीसह भाचे मंडळींचे लाड पुरविण्यासाठी मामा, मावशी, आजी, आजोबा अगोदरच तयारी करून ठेवतात. मात्र, यंदा या आनंदावर विरजण पडले आहे. केवळ फोनवरूनच एकमेकांची विचारपूस केली जात आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/365C0mN

No comments:

Post a Comment