एमएसईबीचे दोन अभियंते निलंबित उस्मानाबाद : विनापरवाना वितरण रोहित्र उभे केल्याच्या कारणावरून उपकार्यकारी अभियंत्यासह सहायक अभियंत्यास निलंबित करण्यात आले आहे. अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी पदरमोड करून उभी केलेली रोहित्र काढून घेणार का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.  कळंब तालुक्यातील काही भागांत विजेची मागणी वाढली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी वितरण रोहित्र बसविण्याचा हट्ट वीज वितरण कंपनीतील अधिकाऱ्यांकडे केला होता. त्यानंतर अधिकाऱ्यांनी वरिष्ठ स्तरावर परवानगी घेणे अपेक्षित होते. किंबहुना संबंधित रोहित्राच्या फाइलला मंजुरी घेणे अपेक्षित होते. हेही वाचा - पुन्हा जमिनीतून गूढ आवाज...कुठे वाचा मात्र वरिष्ठ स्तरावर न कळविताच ठेकेदाराला हाताशी धरून अधिकाऱ्यांनी रोहित्रांची उभारणी करून दिली. यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. या प्रकरणात उपकार्यकारी अभियंता हिप्परगे तसेच सहायक अभियंता सुतार यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील यांनी दिली आहे.  विजेअभावी शेतातील मोटारी सुरू होत नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी स्वतंत्र रोहित्र बसविण्याचा आग्रह धरतात. तेव्हा खासगीरीत्या असे रोहित्र बसविता येत असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले जाते. ठेकेदार शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घेऊन असे रोहित्र बसवितात. त्याला अधिकाऱ्यांकडूनच वीजपुरवठा दिला जातो. यामध्ये शेतकऱ्यांची चूक काहीही नसते. त्यांना याची प्रक्रिया माहिती नसते. प्रत्यक्षात यासाठी परवानगी घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असते. मात्र आता असे रोहित्र बंद करून काढण्याची प्रक्रिया केली जात असल्याने यामध्ये निष्कारण शेतकऱ्यांचा बळी घेतला जात असल्याचे दिसून येत आहे.  ‘ते’ ठेकेदार कोणते?  कळंब तालुक्यातील इटकूर उपकेंद्रात दोन, शिराढोण चार, मोहा, गोविंदपूर आणि कळंब प्रत्येकी एक असे रोहित्र विनापरवाना उभारण्यात आले आहेत. तीन ठेकेदारांनी नऊ रोहित्र उभे केले आहेत. त्यामुळे या तिन्ही ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे हे ठेकेदार नेमके कोणते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. यामध्ये दोन्ही अभियंते दोषी आढळले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.  - श्रीकांत पाटील, अधीक्षक अभियंता  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, May 7, 2020

एमएसईबीचे दोन अभियंते निलंबित उस्मानाबाद : विनापरवाना वितरण रोहित्र उभे केल्याच्या कारणावरून उपकार्यकारी अभियंत्यासह सहायक अभियंत्यास निलंबित करण्यात आले आहे. अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी पदरमोड करून उभी केलेली रोहित्र काढून घेणार का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.  कळंब तालुक्यातील काही भागांत विजेची मागणी वाढली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी वितरण रोहित्र बसविण्याचा हट्ट वीज वितरण कंपनीतील अधिकाऱ्यांकडे केला होता. त्यानंतर अधिकाऱ्यांनी वरिष्ठ स्तरावर परवानगी घेणे अपेक्षित होते. किंबहुना संबंधित रोहित्राच्या फाइलला मंजुरी घेणे अपेक्षित होते. हेही वाचा - पुन्हा जमिनीतून गूढ आवाज...कुठे वाचा मात्र वरिष्ठ स्तरावर न कळविताच ठेकेदाराला हाताशी धरून अधिकाऱ्यांनी रोहित्रांची उभारणी करून दिली. यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. या प्रकरणात उपकार्यकारी अभियंता हिप्परगे तसेच सहायक अभियंता सुतार यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील यांनी दिली आहे.  विजेअभावी शेतातील मोटारी सुरू होत नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी स्वतंत्र रोहित्र बसविण्याचा आग्रह धरतात. तेव्हा खासगीरीत्या असे रोहित्र बसविता येत असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले जाते. ठेकेदार शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घेऊन असे रोहित्र बसवितात. त्याला अधिकाऱ्यांकडूनच वीजपुरवठा दिला जातो. यामध्ये शेतकऱ्यांची चूक काहीही नसते. त्यांना याची प्रक्रिया माहिती नसते. प्रत्यक्षात यासाठी परवानगी घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असते. मात्र आता असे रोहित्र बंद करून काढण्याची प्रक्रिया केली जात असल्याने यामध्ये निष्कारण शेतकऱ्यांचा बळी घेतला जात असल्याचे दिसून येत आहे.  ‘ते’ ठेकेदार कोणते?  कळंब तालुक्यातील इटकूर उपकेंद्रात दोन, शिराढोण चार, मोहा, गोविंदपूर आणि कळंब प्रत्येकी एक असे रोहित्र विनापरवाना उभारण्यात आले आहेत. तीन ठेकेदारांनी नऊ रोहित्र उभे केले आहेत. त्यामुळे या तिन्ही ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे हे ठेकेदार नेमके कोणते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. यामध्ये दोन्ही अभियंते दोषी आढळले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.  - श्रीकांत पाटील, अधीक्षक अभियंता  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3cgrKu2

No comments:

Post a Comment