दहावी, बारावीची पेपरतपासणी ठप्प; लॉकडाऊनमुळे यंदा निकाल लांबणीवर मुंबई - राज्य शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांच्या पेपरतपासणीचे काम कोरोनामुळे ठप्प झाले आहे. लॉकडाऊनमुळे शिक्षकांना शाळेत जाणे शक्‍य नाही. त्यामुळे दहावी, बारावीच्या पेपरतपासणीचे काम सध्या बंद असल्याने यंदा दोन्ही परीक्षांचे निकाल उशिरा लागणार आहेत. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शिक्षकांनी पेपरतपासणीसाठी घरी घेऊन जावेत, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्य मंडळामार्फत बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान; तर दहावीची परीक्षा ३ ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आली. कोरोनामुळे दहावीचा भूगोल विषयाचा अखेरचा पेपर स्थगित करण्यात आला. राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर शिक्षण विभागाने शिक्षकांना पेपर घरी तपासण्याची मुभा दिली होती; परंतु आता केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केल्याने शिक्षकांना शाळेत जाऊन पेपर घेऊन येणे शक्‍य नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने १४ एप्रिलनंतर शाळेत येऊन शिक्षकांनी पेपर घरी तपासणीसाठी घेऊन जावेत, असे निर्देश दिले आहेत. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, March 28, 2020

दहावी, बारावीची पेपरतपासणी ठप्प; लॉकडाऊनमुळे यंदा निकाल लांबणीवर मुंबई - राज्य शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांच्या पेपरतपासणीचे काम कोरोनामुळे ठप्प झाले आहे. लॉकडाऊनमुळे शिक्षकांना शाळेत जाणे शक्‍य नाही. त्यामुळे दहावी, बारावीच्या पेपरतपासणीचे काम सध्या बंद असल्याने यंदा दोन्ही परीक्षांचे निकाल उशिरा लागणार आहेत. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शिक्षकांनी पेपरतपासणीसाठी घरी घेऊन जावेत, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्य मंडळामार्फत बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान; तर दहावीची परीक्षा ३ ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आली. कोरोनामुळे दहावीचा भूगोल विषयाचा अखेरचा पेपर स्थगित करण्यात आला. राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर शिक्षण विभागाने शिक्षकांना पेपर घरी तपासण्याची मुभा दिली होती; परंतु आता केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केल्याने शिक्षकांना शाळेत जाऊन पेपर घेऊन येणे शक्‍य नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने १४ एप्रिलनंतर शाळेत येऊन शिक्षकांनी पेपर घरी तपासणीसाठी घेऊन जावेत, असे निर्देश दिले आहेत. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3dB5Ti1

No comments:

Post a Comment