महामंडळांवरील नियुक्‍त्यांसाठी दोन्ही काँग्रेस आग्रही  मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडल्यानंतर महत्वाच्या महामंडळावरील नियुक्‍त्यांचे निर्णय व्हावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आग्रही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने सुमारे २५ महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची नावे नियुक्‍तीसाठी निश्‍चित केली आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अत्यंत काटेकोरपणे या संभाव्य याद्या तयार केल्याचे समजल्याने काँग्रेसनेही आपल्याला हव्या असलेल्या मंडळींवर विचार केला आहे.  - आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकत्रित विनंती करीत यासंबंधी त्वरित बैठक बोलवावी अशी विनंती केली असल्याचे समजते. मात्र उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने यासंबंधात अद्याप हिरव झेंडा दाखवलेला नाही. राज्यभरात कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये याची काळजी घ्यायची असल्याने मुख्यमंत्री ठाकरे कमालीची दक्षता घेत आहेत. एका दिवसात ते जवळपास चार वेळा आरोग्य विभागाशी संपर्क साधत आहेत.  या कामामुळे त्यांना महामंडळांवरील नियुक्‍त्यांचा विषय मार्गी लावण्यासाठी वेळ काढता आला नसल्याचेही त्यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याने नमूद केले.  - कोरेगाव भीमा : नवलखा, तेलतुंबडे यांच्या अडचणीत वाढ; सुप्रीम कोर्टाचे आदेश पक्षांना नाराज न करण्याचे आव्हान राज्यातील सिंचन महामंडळे विदर्भ कृष्णा खोरे, म्हाडा, सिडको तसेच देवस्थान मंडळे अत्यंत महत्त्वाची मानली जातात.तेथे नियुक्‍ती करताना कोणते सूत्र अंमलात आणायचे? महाविकास आघाडीतील तीन घटक पक्षांना कसे सांभाळायचे, त्यासाठीचे सूत्र कोणते?, हे प्रश्‍न लवकरच चर्चेला घ्यावे लागतील असे मानले जाते. नाराज निष्ठावंतांना तसेच संभाव्य पाठीराख्यांना सामावून घेण्याचे आव्हान तिन्ही पक्षांना लक्षात घ्यावे लागणार आहे. कोणताही पक्ष नाराज न होता या संबंधातले निर्णय येत्या महिन्यात मार्गी लागतील, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सामावून घेतले जाईल, अशी माहिती शिवसेनेतील एका उच्चपदस्थाने दिली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 16, 2020

महामंडळांवरील नियुक्‍त्यांसाठी दोन्ही काँग्रेस आग्रही  मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडल्यानंतर महत्वाच्या महामंडळावरील नियुक्‍त्यांचे निर्णय व्हावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आग्रही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने सुमारे २५ महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची नावे नियुक्‍तीसाठी निश्‍चित केली आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अत्यंत काटेकोरपणे या संभाव्य याद्या तयार केल्याचे समजल्याने काँग्रेसनेही आपल्याला हव्या असलेल्या मंडळींवर विचार केला आहे.  - आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकत्रित विनंती करीत यासंबंधी त्वरित बैठक बोलवावी अशी विनंती केली असल्याचे समजते. मात्र उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने यासंबंधात अद्याप हिरव झेंडा दाखवलेला नाही. राज्यभरात कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये याची काळजी घ्यायची असल्याने मुख्यमंत्री ठाकरे कमालीची दक्षता घेत आहेत. एका दिवसात ते जवळपास चार वेळा आरोग्य विभागाशी संपर्क साधत आहेत.  या कामामुळे त्यांना महामंडळांवरील नियुक्‍त्यांचा विषय मार्गी लावण्यासाठी वेळ काढता आला नसल्याचेही त्यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याने नमूद केले.  - कोरेगाव भीमा : नवलखा, तेलतुंबडे यांच्या अडचणीत वाढ; सुप्रीम कोर्टाचे आदेश पक्षांना नाराज न करण्याचे आव्हान राज्यातील सिंचन महामंडळे विदर्भ कृष्णा खोरे, म्हाडा, सिडको तसेच देवस्थान मंडळे अत्यंत महत्त्वाची मानली जातात.तेथे नियुक्‍ती करताना कोणते सूत्र अंमलात आणायचे? महाविकास आघाडीतील तीन घटक पक्षांना कसे सांभाळायचे, त्यासाठीचे सूत्र कोणते?, हे प्रश्‍न लवकरच चर्चेला घ्यावे लागतील असे मानले जाते. नाराज निष्ठावंतांना तसेच संभाव्य पाठीराख्यांना सामावून घेण्याचे आव्हान तिन्ही पक्षांना लक्षात घ्यावे लागणार आहे. कोणताही पक्ष नाराज न होता या संबंधातले निर्णय येत्या महिन्यात मार्गी लागतील, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सामावून घेतले जाईल, अशी माहिती शिवसेनेतील एका उच्चपदस्थाने दिली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3b5FBCJ

No comments:

Post a Comment