उल्लेखनीय! जखमी प्राण्यांना मिळेल आता येथे आधार कणकवली (सिंधुदुर्ग) - महामार्ग चौपदरीकरणानंतर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांना धडकून वन्यप्राणी जखमी होण्याचेही प्रमाण वाढण्याची शक्‍यता आहे. या प्राण्यांवर तातडीने उपचार व्हावेत, ते पूर्ण बरे व्हावेत यासाठी कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीत वन्यजीव शुश्रूषा केंद्राची उभारणी होणार आहे. त्यासाठी वनविभाग 50 लाख रुपये खर्च करणार आहे. या केंद्रांमध्ये वन्यप्राण्यांची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका आणि पशुवैद्यकीय अधिकारीही सज्ज असेल.  सिंधुदुर्गातील महामार्ग चौपदरीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. या वर्षअखेरपर्यंत सर्व उड्डाणपूल, नद्यांवरील पूल, मोऱ्या आदींची बांधकामे पूर्ण होऊन दोन्ही मार्गिका वाहतुकीसाठी सुरू होणार आहेत. चौपदरीकरणानंतर महामार्गावरून जा-ये करणाऱ्या वाहनांचाही वेग सुसाट असणार आहे. या भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांना धडकून जखमी होणाऱ्या वन्यप्राण्यांसाठी आता सावंतवाडी वनविभागामार्फत हक्‍काचे शुश्रूषा केंद्र उभे राहणार आहे.  वन्यप्राण्यांवर तातडीने उपचार होण्यासाठी कणकवली तालुक्‍यात फोंडाघाट तर कुडाळ तालुक्‍यातील माणगाव-आंबेरी येथील वनविभागाच्या जागेत ही शुश्रूषा केंद्रे सुरू होणार आहेत. सावंतवाडीत अद्यापही जागेची निश्‍चिती झाली नसली तरी उपरलकर किंवा सावंतवाडी वनविभागाच्या जागेत या केंद्रांची उभारणी निश्‍चित केली आहे.  वन्यप्राणी शुश्रूषा केंद्रामध्ये अपघातग्रस्त वन्यप्राणी ने-आण करण्यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. याखेरीज तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारीही या केंद्रांमध्ये उपलब्ध असतील, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली. वर्ष अखेरपर्यंत कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीत वन्यप्राणी शुश्रूषा केंद्रांची उभारणी होणार आहे.  अपघातग्रस्त वन्यप्राण्यांवर उपचार करण्याबरोबरच हवेत विहार करणाऱ्या पण विविध कारणांमुळे अपघातग्रस्त झालेल्या, आत्मविश्‍वास गमावलेल्या पक्षांनाही या केंद्रांमध्ये उपचार आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे. या वन्यप्राणी शुश्रूषा केंद्रांमुळे जखमी अवस्थेतील वन्यप्राण्यांना नवजीवन मिळू शकणार आहे. तसेच हे केंद्र म्हणजे या प्राण्यांसाठी हक्काचे घरकुल ठरणार आहे. महत्वाची बाब म्हणजे अपघातग्रस्त झालेला वन्यप्राणी पूर्वपदावर येईपर्यंत, स्वतःची शिकार स्वतः करेपर्यंत त्याची शुश्रूषा या केंद्रात केली जाणार आहे. त्याकालावधीतील सर्व खर्च देखील वनविभाग करणार आहे.  राज्यात काही मोजक्‍याच ठिकाणी वन्यजीव संवर्धन केंद्रे आहेत. यात कोल्हापूर येथील वन्यजीव संवर्धन केंद्राच्या धर्तीवर सिंधुदुर्गातील कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडीतील वनविभागाच्या जागेत, असे केंद्र उभे केले जाणार आहेत. यात सर्व वन्यप्राण्यांवर उपचाराची व्यवस्था आणि सज्जता असेल.  - समाधान चव्हाण, उपवनसंरक्षक वनविभाग सावंतवाडी.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 16, 2020

उल्लेखनीय! जखमी प्राण्यांना मिळेल आता येथे आधार कणकवली (सिंधुदुर्ग) - महामार्ग चौपदरीकरणानंतर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांना धडकून वन्यप्राणी जखमी होण्याचेही प्रमाण वाढण्याची शक्‍यता आहे. या प्राण्यांवर तातडीने उपचार व्हावेत, ते पूर्ण बरे व्हावेत यासाठी कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीत वन्यजीव शुश्रूषा केंद्राची उभारणी होणार आहे. त्यासाठी वनविभाग 50 लाख रुपये खर्च करणार आहे. या केंद्रांमध्ये वन्यप्राण्यांची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका आणि पशुवैद्यकीय अधिकारीही सज्ज असेल.  सिंधुदुर्गातील महामार्ग चौपदरीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. या वर्षअखेरपर्यंत सर्व उड्डाणपूल, नद्यांवरील पूल, मोऱ्या आदींची बांधकामे पूर्ण होऊन दोन्ही मार्गिका वाहतुकीसाठी सुरू होणार आहेत. चौपदरीकरणानंतर महामार्गावरून जा-ये करणाऱ्या वाहनांचाही वेग सुसाट असणार आहे. या भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांना धडकून जखमी होणाऱ्या वन्यप्राण्यांसाठी आता सावंतवाडी वनविभागामार्फत हक्‍काचे शुश्रूषा केंद्र उभे राहणार आहे.  वन्यप्राण्यांवर तातडीने उपचार होण्यासाठी कणकवली तालुक्‍यात फोंडाघाट तर कुडाळ तालुक्‍यातील माणगाव-आंबेरी येथील वनविभागाच्या जागेत ही शुश्रूषा केंद्रे सुरू होणार आहेत. सावंतवाडीत अद्यापही जागेची निश्‍चिती झाली नसली तरी उपरलकर किंवा सावंतवाडी वनविभागाच्या जागेत या केंद्रांची उभारणी निश्‍चित केली आहे.  वन्यप्राणी शुश्रूषा केंद्रामध्ये अपघातग्रस्त वन्यप्राणी ने-आण करण्यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. याखेरीज तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारीही या केंद्रांमध्ये उपलब्ध असतील, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली. वर्ष अखेरपर्यंत कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीत वन्यप्राणी शुश्रूषा केंद्रांची उभारणी होणार आहे.  अपघातग्रस्त वन्यप्राण्यांवर उपचार करण्याबरोबरच हवेत विहार करणाऱ्या पण विविध कारणांमुळे अपघातग्रस्त झालेल्या, आत्मविश्‍वास गमावलेल्या पक्षांनाही या केंद्रांमध्ये उपचार आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे. या वन्यप्राणी शुश्रूषा केंद्रांमुळे जखमी अवस्थेतील वन्यप्राण्यांना नवजीवन मिळू शकणार आहे. तसेच हे केंद्र म्हणजे या प्राण्यांसाठी हक्काचे घरकुल ठरणार आहे. महत्वाची बाब म्हणजे अपघातग्रस्त झालेला वन्यप्राणी पूर्वपदावर येईपर्यंत, स्वतःची शिकार स्वतः करेपर्यंत त्याची शुश्रूषा या केंद्रात केली जाणार आहे. त्याकालावधीतील सर्व खर्च देखील वनविभाग करणार आहे.  राज्यात काही मोजक्‍याच ठिकाणी वन्यजीव संवर्धन केंद्रे आहेत. यात कोल्हापूर येथील वन्यजीव संवर्धन केंद्राच्या धर्तीवर सिंधुदुर्गातील कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडीतील वनविभागाच्या जागेत, असे केंद्र उभे केले जाणार आहेत. यात सर्व वन्यप्राण्यांवर उपचाराची व्यवस्था आणि सज्जता असेल.  - समाधान चव्हाण, उपवनसंरक्षक वनविभाग सावंतवाडी.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2UgLNAO

No comments:

Post a Comment