Coronavirus : जनतेने घाबरून जाऊ नये; पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या मुकाबल्यासाठी सरकारची तयारी पुरेशी असून, सर्व मंत्रालयांमध्ये समन्वय आहे. जनतेने घाबरून जाऊ नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. दरम्यान, भारतात कोरोनाचा संभाव्य उपद्रव टाळण्यासाठी इटली, इराण, दक्षिण कोरिया आणि जपानच्या नागरिकांना देण्यात आलेले सर्व प्रकारचे व्हिसा तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आले आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ‘कोरोना’ला पायबंद घालण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर नागरिकांना स्वतःची काळजी घेण्यासाठी आवाहन करणारे ट्‌विट केले. पंतप्रधानांच्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आज सविस्तर आढावा घेतला. भारतात येणाऱ्या प्रवाशांच्या चाचणीपासून ते उपचारापर्यंत सर्व बाबींसाठी सरकारच्या मंत्रालयांमध्ये समन्वय आहे. त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही. सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची तसेच स्वसुरक्षेसाठी लहान लहान परंतु महत्त्वाचे उपाय करण्याची गरज आहे.  Video : अभिनेत्री म्हणते, 'अभिनंदन, देशात कोरोनाचे आगमन झालंय' कोरोनाची झळ बसलेल्या देशांमधील प्रवाशांना भारतात येण्यापासून रोखले जाऊ शकते, असे स्पष्ट संकेत सरकारने काल दिले होते. त्यापार्श्‍वभूमीवर आज इटली, इराण, दक्षिण कोरिया तसेच जपान या देशांच्या नागरिकांना दिलेले सर्व प्रकारचे नियमित व्हिसा रद्द करण्यात आले आहे ज्यांना भारतात प्रवास अत्यावश्‍यक असेल, अशा नागरिकांना भारतीय वकिलातीतून किंवा वाणिज्य दूतावासातून नवा व्हिसा घ्यावा लागेल, असे आदेश सरकारने जारी केले आहेत. याआधी चिनी प्रवाशांचे सर्व प्रकारचे व्हिसा ५ फेब्रुवारीपासूनच निलंबित करण्यात आले होते. आता एक फेब्रुवारीनंतर चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया आणि जपानचा प्रवास करणाऱ्या आणि भारतात येण्याचे नियोजन असलेल्या परदेशी प्रवाशांचेदेखील सर्व व्हिसा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  Coronavirus : राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र; म्हणाले... अर्थात, या देशांचे वैमानिक, राजनैतिक अधिकारी, संयुक्त राष्ट्र संघ आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनाचे पदाधिकारी, ओआयसी कार्डधारकांना या प्रतिबंधांमधून सूट देण्यात आली असली तरी त्यांची वैद्यकीय चाचणी बंधनकारक असेल. तर, भारतात आलेल्या परदेशी प्रवाशांना आपला व्यक्तिगत तपशील, दूरध्वनी क्रमांक आणि भारतातील पत्ता तसेच प्रवासाची ठिकाणे याची माहिती भारतीय अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक असेल. दरम्यान, वर उल्लेख केलेल्या देशांशिवाय हॉंगकॉंग, मकाऊ, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, नेपाळ, थायलॅंड, सिंगापूर तसेच तैवान या देशांमधून आलेल्या भारतीय तसेच परदेशी प्रवाशांना भारतामध्ये वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागेल, असेही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 3, 2020

Coronavirus : जनतेने घाबरून जाऊ नये; पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या मुकाबल्यासाठी सरकारची तयारी पुरेशी असून, सर्व मंत्रालयांमध्ये समन्वय आहे. जनतेने घाबरून जाऊ नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. दरम्यान, भारतात कोरोनाचा संभाव्य उपद्रव टाळण्यासाठी इटली, इराण, दक्षिण कोरिया आणि जपानच्या नागरिकांना देण्यात आलेले सर्व प्रकारचे व्हिसा तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आले आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ‘कोरोना’ला पायबंद घालण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर नागरिकांना स्वतःची काळजी घेण्यासाठी आवाहन करणारे ट्‌विट केले. पंतप्रधानांच्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आज सविस्तर आढावा घेतला. भारतात येणाऱ्या प्रवाशांच्या चाचणीपासून ते उपचारापर्यंत सर्व बाबींसाठी सरकारच्या मंत्रालयांमध्ये समन्वय आहे. त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही. सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची तसेच स्वसुरक्षेसाठी लहान लहान परंतु महत्त्वाचे उपाय करण्याची गरज आहे.  Video : अभिनेत्री म्हणते, 'अभिनंदन, देशात कोरोनाचे आगमन झालंय' कोरोनाची झळ बसलेल्या देशांमधील प्रवाशांना भारतात येण्यापासून रोखले जाऊ शकते, असे स्पष्ट संकेत सरकारने काल दिले होते. त्यापार्श्‍वभूमीवर आज इटली, इराण, दक्षिण कोरिया तसेच जपान या देशांच्या नागरिकांना दिलेले सर्व प्रकारचे नियमित व्हिसा रद्द करण्यात आले आहे ज्यांना भारतात प्रवास अत्यावश्‍यक असेल, अशा नागरिकांना भारतीय वकिलातीतून किंवा वाणिज्य दूतावासातून नवा व्हिसा घ्यावा लागेल, असे आदेश सरकारने जारी केले आहेत. याआधी चिनी प्रवाशांचे सर्व प्रकारचे व्हिसा ५ फेब्रुवारीपासूनच निलंबित करण्यात आले होते. आता एक फेब्रुवारीनंतर चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया आणि जपानचा प्रवास करणाऱ्या आणि भारतात येण्याचे नियोजन असलेल्या परदेशी प्रवाशांचेदेखील सर्व व्हिसा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  Coronavirus : राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र; म्हणाले... अर्थात, या देशांचे वैमानिक, राजनैतिक अधिकारी, संयुक्त राष्ट्र संघ आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनाचे पदाधिकारी, ओआयसी कार्डधारकांना या प्रतिबंधांमधून सूट देण्यात आली असली तरी त्यांची वैद्यकीय चाचणी बंधनकारक असेल. तर, भारतात आलेल्या परदेशी प्रवाशांना आपला व्यक्तिगत तपशील, दूरध्वनी क्रमांक आणि भारतातील पत्ता तसेच प्रवासाची ठिकाणे याची माहिती भारतीय अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक असेल. दरम्यान, वर उल्लेख केलेल्या देशांशिवाय हॉंगकॉंग, मकाऊ, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, नेपाळ, थायलॅंड, सिंगापूर तसेच तैवान या देशांमधून आलेल्या भारतीय तसेच परदेशी प्रवाशांना भारतामध्ये वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागेल, असेही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3aqP7jr

No comments:

Post a Comment