Coronavirus : उद्योगनगरीतील उद्योजक आर्थिक अडचणीत पिंपरी - कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे उद्योगनगरीतील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी अनेक उद्योजकांना बॅंकाकडून कर्ज घ्यावे लागणार आहे. उद्योगनगरीत लॉकडाऊन असल्यामुळे येथील सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे उद्योजकांच्या अडचणी वाढत आहे. दरम्यान, सरकारने सूचना दिल्याने उद्योजकांना कर्मचाऱ्यांचे पूर्ण पगार द्यावे लागणार आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर तिथून होणारी निर्यात पूर्णपणे बंद करण्यात आली. त्याचा फटका उद्योगांना बसला आहे. इंजिनिअरिंग, ऑटोमोबाइल याबरोबरच अन्य क्षेत्रात असणाऱ्या कंपन्यांना आवश्‍यक असणारे सुटे भाग तयार करण्याचे काम शहरातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजक करीत असतात. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना कच्चा माल मिळालेला नाही, त्याचा फटका उत्पादन निर्मितीवर झाला आहे. आता लॉकडाउन असल्यामुळे उत्पादन निर्मितीची प्रक्रिया पूर्णपणे बंद आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत देण्यासाठी या उद्योजकांना आर्थिक तजवीज करावी लागणार आहे.  दरम्यान, मोठे उद्योगही पूर्णपणे बंद असल्यामुळे त्यांना पुरवठा केलेल्या कच्च्या मालाची रक्‍कम हातात पडण्यासाठी या उद्योजकांना आणखी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे. केंद्र सरकारने हप्ते भरण्यासाठी तीन महिन्यांची सवलत दिली असली तरी त्यासाठीचे सोपस्कार पूर्ण करण्यात उद्योजकांना अडचणी येत आहेत. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 31, 2020

Coronavirus : उद्योगनगरीतील उद्योजक आर्थिक अडचणीत पिंपरी - कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे उद्योगनगरीतील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी अनेक उद्योजकांना बॅंकाकडून कर्ज घ्यावे लागणार आहे. उद्योगनगरीत लॉकडाऊन असल्यामुळे येथील सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे उद्योजकांच्या अडचणी वाढत आहे. दरम्यान, सरकारने सूचना दिल्याने उद्योजकांना कर्मचाऱ्यांचे पूर्ण पगार द्यावे लागणार आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर तिथून होणारी निर्यात पूर्णपणे बंद करण्यात आली. त्याचा फटका उद्योगांना बसला आहे. इंजिनिअरिंग, ऑटोमोबाइल याबरोबरच अन्य क्षेत्रात असणाऱ्या कंपन्यांना आवश्‍यक असणारे सुटे भाग तयार करण्याचे काम शहरातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजक करीत असतात. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना कच्चा माल मिळालेला नाही, त्याचा फटका उत्पादन निर्मितीवर झाला आहे. आता लॉकडाउन असल्यामुळे उत्पादन निर्मितीची प्रक्रिया पूर्णपणे बंद आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत देण्यासाठी या उद्योजकांना आर्थिक तजवीज करावी लागणार आहे.  दरम्यान, मोठे उद्योगही पूर्णपणे बंद असल्यामुळे त्यांना पुरवठा केलेल्या कच्च्या मालाची रक्‍कम हातात पडण्यासाठी या उद्योजकांना आणखी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे. केंद्र सरकारने हप्ते भरण्यासाठी तीन महिन्यांची सवलत दिली असली तरी त्यासाठीचे सोपस्कार पूर्ण करण्यात उद्योजकांना अडचणी येत आहेत. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3bHUV8U

No comments:

Post a Comment