गंभीर..संचारबंदी झुगारून हे उपद्व्याप साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) -  वीजघर येथील पोलिस नाक्‍यावरील पोलिसांच्या दुर्लक्षामुळे चंदगड, कोल्हापूर, बेळगावकडे जाणाऱ्या कामगारांचे संचारबंदी झुगारून आडमार्गाने स्थलांतर सुरू आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.  संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसची झळ देशासह महाराष्ट्रालाही बसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्य सरकारने 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन पुकारले आहे. जिथे आहात तिथेच थांबा. ज्या-ज्या ठिकाणी कामानिमित्त आहात त्याच ठिकाणी लोकांना थांबण्याच्या सूचना प्रत्येक वेळी दिल्या जात आहे. दोडामार्ग तालुक्‍यातील वीजघर येथील पोलिस आणि आरोग्य पथकाच्या दुर्लक्षामुळे अनेकांचे जीव धोक्‍यात आले आहेत. गोव्यातून आलेले अनेकजण दोडामार्गहून कोल्हापूर, बेळगावकडे राजरोसपणे स्थलांतर करत आहेत; पण वीजघर येथील पोलिस त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. त्याबद्दल युवासेनेचे तालुका समन्वयक मदन राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  दरम्यान, गोवा राज्यात कामानिमित्त असलेले बेळगाव, कोल्हापूर, चंदगड या भागातील तरुण-तरुणी लॉकडाऊन असताना आता आडमार्गाने वीजघर येथून तिलारी घाटातून आपापल्या घरी परत जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्या तरुण तरुणींची विचारपूस केली असता त्यातील काही तरुण-तरुणी बेळगाव, कोल्हापूर, चंदगड या भागातील असल्याचे सांगण्यात आले. आपल्या तालुक्‍यात, जिल्ह्यात इतर राज्यातून नागरिक येता कामा नये, आपल्या जिल्ह्यातील नागरिक तालुका आणि जिल्ह्याबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांची ठिकठिकाणी नाकाबंदी असताना त्या तरुण तरुणींना आपल्या दोडामार्ग तालुक्‍यात कसा काय प्रवेश दिला जातो व त्यांना इतर जिल्ह्यात विनाचौकशी पाठविले जात आहेत, असा प्रश्न मदन राणे यांनी उपस्थित करत आमच्या सुरक्षिततेसाठी पोलिस जर जातिनिशी लक्ष देत नसतील तर नाईलाजास्तव आम्ही रस्त्यावर उतरून परराज्यातून येणाऱ्या नागरिकांना रोखणार असल्याचा इशारा मदन राणे यांनी दिला आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 30, 2020

गंभीर..संचारबंदी झुगारून हे उपद्व्याप साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) -  वीजघर येथील पोलिस नाक्‍यावरील पोलिसांच्या दुर्लक्षामुळे चंदगड, कोल्हापूर, बेळगावकडे जाणाऱ्या कामगारांचे संचारबंदी झुगारून आडमार्गाने स्थलांतर सुरू आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.  संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसची झळ देशासह महाराष्ट्रालाही बसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्य सरकारने 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन पुकारले आहे. जिथे आहात तिथेच थांबा. ज्या-ज्या ठिकाणी कामानिमित्त आहात त्याच ठिकाणी लोकांना थांबण्याच्या सूचना प्रत्येक वेळी दिल्या जात आहे. दोडामार्ग तालुक्‍यातील वीजघर येथील पोलिस आणि आरोग्य पथकाच्या दुर्लक्षामुळे अनेकांचे जीव धोक्‍यात आले आहेत. गोव्यातून आलेले अनेकजण दोडामार्गहून कोल्हापूर, बेळगावकडे राजरोसपणे स्थलांतर करत आहेत; पण वीजघर येथील पोलिस त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. त्याबद्दल युवासेनेचे तालुका समन्वयक मदन राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  दरम्यान, गोवा राज्यात कामानिमित्त असलेले बेळगाव, कोल्हापूर, चंदगड या भागातील तरुण-तरुणी लॉकडाऊन असताना आता आडमार्गाने वीजघर येथून तिलारी घाटातून आपापल्या घरी परत जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्या तरुण तरुणींची विचारपूस केली असता त्यातील काही तरुण-तरुणी बेळगाव, कोल्हापूर, चंदगड या भागातील असल्याचे सांगण्यात आले. आपल्या तालुक्‍यात, जिल्ह्यात इतर राज्यातून नागरिक येता कामा नये, आपल्या जिल्ह्यातील नागरिक तालुका आणि जिल्ह्याबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांची ठिकठिकाणी नाकाबंदी असताना त्या तरुण तरुणींना आपल्या दोडामार्ग तालुक्‍यात कसा काय प्रवेश दिला जातो व त्यांना इतर जिल्ह्यात विनाचौकशी पाठविले जात आहेत, असा प्रश्न मदन राणे यांनी उपस्थित करत आमच्या सुरक्षिततेसाठी पोलिस जर जातिनिशी लक्ष देत नसतील तर नाईलाजास्तव आम्ही रस्त्यावर उतरून परराज्यातून येणाऱ्या नागरिकांना रोखणार असल्याचा इशारा मदन राणे यांनी दिला आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3bEfi6Y

No comments:

Post a Comment