कर्जमुक्ती योजनेतुन आतापर्यंत पंधरा लाख शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण मुंबई - महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी प्रसिद्ध केल्यानंतर अवघ्या काही दिवसांत १५ लाख ४५ हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. यापैकी 13 लाख 88 हजार कर्जखात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम शासनाकडून जमा करण्यात आली असून, ती सुमारे रुपये 9035 कोटी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना याबाबतीत कुठलीही अडचण येऊ नये व त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना सहकार विभागास दिल्या आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  योजनेच्या अंमलबजावणीमध्ये योजनेअंतर्गत अतिशय पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्यांची गावनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने यादी प्रसिद्धीकरण आणि आधार प्रमाणीकरण विनाखंड व विनातक्रार पार पाडण्यासाठी पूर्वनियोजन केले आहे. ही कार्यवाही मोहीमस्वरूपात राबविण्यात येत आहे अशी माहिती सहकार प्रधान सचिव आभा शुक्‍ला यांनी दिली. प्रसिद्ध यादीतील शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यानंतर, त्यांना यादीत नमूद कर्जखात्याची रक्कम मान्य किंवा अमान्य अशा दोन्ही परिस्थितीमध्ये संगणकीय पावती देण्यात येते. यावरून योजनेची अंमलबजावणी पारदर्शकपणे राबविण्यात येत असल्याबाबतची काळजी घेण्यात आली. ज्या शेतकऱ्यांना आपला आधार क्रमांक किंवा कर्जखात्यामध्ये दर्शविलेली रक्कम अमान्य आहे, अशा प्रकरणांमध्ये सर्व जिल्ह्यांमधील जिल्हास्तरीय समितीमार्फत तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 5, 2020

कर्जमुक्ती योजनेतुन आतापर्यंत पंधरा लाख शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण मुंबई - महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी प्रसिद्ध केल्यानंतर अवघ्या काही दिवसांत १५ लाख ४५ हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. यापैकी 13 लाख 88 हजार कर्जखात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम शासनाकडून जमा करण्यात आली असून, ती सुमारे रुपये 9035 कोटी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना याबाबतीत कुठलीही अडचण येऊ नये व त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना सहकार विभागास दिल्या आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  योजनेच्या अंमलबजावणीमध्ये योजनेअंतर्गत अतिशय पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्यांची गावनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने यादी प्रसिद्धीकरण आणि आधार प्रमाणीकरण विनाखंड व विनातक्रार पार पाडण्यासाठी पूर्वनियोजन केले आहे. ही कार्यवाही मोहीमस्वरूपात राबविण्यात येत आहे अशी माहिती सहकार प्रधान सचिव आभा शुक्‍ला यांनी दिली. प्रसिद्ध यादीतील शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यानंतर, त्यांना यादीत नमूद कर्जखात्याची रक्कम मान्य किंवा अमान्य अशा दोन्ही परिस्थितीमध्ये संगणकीय पावती देण्यात येते. यावरून योजनेची अंमलबजावणी पारदर्शकपणे राबविण्यात येत असल्याबाबतची काळजी घेण्यात आली. ज्या शेतकऱ्यांना आपला आधार क्रमांक किंवा कर्जखात्यामध्ये दर्शविलेली रक्कम अमान्य आहे, अशा प्रकरणांमध्ये सर्व जिल्ह्यांमधील जिल्हास्तरीय समितीमार्फत तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2TH1KjB

No comments:

Post a Comment