कणकवलीत दुकानाला आग, २५ लाखांचे नुकसान  कणकवली (सिंधुदुर्ग) - येथील मुख्य बाजारपेठेतील सदानंद बाणे यांच्या किराणा दुकानाला आज अचानक भीषण आग लागली. यात सुमारे 25 लाखांचे नुकसान झाले. दिलीप बिल्डकॉन व नगरपंचायत अग्निशामक बंबाच्या साहाय्याने आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.  शहरातील मुख्य चौकालगत बाणे यांचे किराणा दुकान आहे. मालक श्री. बाणे आज रविवार असूनही सकाळी सातच्या सुमारास आले. दुकान उघल्यावर त्यांना आग लागल्याचे कळाले. त्यांनी तत्काळ शेजारील नागरिकांना सांगितले. आग लागल्यानंतर संपूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरले होते. याठिकाणी नगरपंचायत कणकवलीचा अग्निशामक बंब पाचारण करण्यात आला; मात्र त्यात पाणी नसल्याने मोठी गैरसोय झाली होती. त्यावेळी दिलीप बिल्डकॉनचा पाण्याचा टॅंकर बोलवण्यात आला. तेव्हा तो टॅंकर शिवाजी चौक येथे होता. या टॅंकरमुळे आग नियंत्रणात आली. घटनेची माहिती मिळताच शहरातील नागरिक, नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी यांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्यात सहभाग घेतला.  घटनास्थळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार आणि पोलिस अधिकारी यांनीसुद्धा आगीच्या ठिकाणी भेट देऊन ती विझविण्यासाठी मदत पथकाला सूचना देत आगीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर महसूल विभागाने आगीने जळालेल्या सामानाचा पंचनामा केला. या आगीत किराणा सामान पूर्णतः जळाले असून, इतर सामान पाण्यात भिजल्याने सुमारे 25 लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, November 1, 2020

कणकवलीत दुकानाला आग, २५ लाखांचे नुकसान  कणकवली (सिंधुदुर्ग) - येथील मुख्य बाजारपेठेतील सदानंद बाणे यांच्या किराणा दुकानाला आज अचानक भीषण आग लागली. यात सुमारे 25 लाखांचे नुकसान झाले. दिलीप बिल्डकॉन व नगरपंचायत अग्निशामक बंबाच्या साहाय्याने आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.  शहरातील मुख्य चौकालगत बाणे यांचे किराणा दुकान आहे. मालक श्री. बाणे आज रविवार असूनही सकाळी सातच्या सुमारास आले. दुकान उघल्यावर त्यांना आग लागल्याचे कळाले. त्यांनी तत्काळ शेजारील नागरिकांना सांगितले. आग लागल्यानंतर संपूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरले होते. याठिकाणी नगरपंचायत कणकवलीचा अग्निशामक बंब पाचारण करण्यात आला; मात्र त्यात पाणी नसल्याने मोठी गैरसोय झाली होती. त्यावेळी दिलीप बिल्डकॉनचा पाण्याचा टॅंकर बोलवण्यात आला. तेव्हा तो टॅंकर शिवाजी चौक येथे होता. या टॅंकरमुळे आग नियंत्रणात आली. घटनेची माहिती मिळताच शहरातील नागरिक, नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी यांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्यात सहभाग घेतला.  घटनास्थळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार आणि पोलिस अधिकारी यांनीसुद्धा आगीच्या ठिकाणी भेट देऊन ती विझविण्यासाठी मदत पथकाला सूचना देत आगीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर महसूल विभागाने आगीने जळालेल्या सामानाचा पंचनामा केला. या आगीत किराणा सामान पूर्णतः जळाले असून, इतर सामान पाण्यात भिजल्याने सुमारे 25 लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2HUeEZq

No comments:

Post a Comment