नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन अखेर स्थगित..! औरंगाबाद : राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील राजपत्रित अधिकारी तसेच अ-राजपत्रित अधिकारी संघटना आणि कर्मचारी संघटनेतर्फे मंगळवार (ता.०४) चार वाजेपासून विविध प्रलंबित मागण्यांसाठी बे-मुदत लेखणी बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. मागण्या दोन महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन राज्य शासनाने संघटनांना दिल्याने तूर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. संघटनेचे राज्य अध्यक्ष गजू खोत तसेच उपजिल्हाधिकारी तथा नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक सोहम वायाळ यांनी देखील आंदोलन स्थगित झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक    अधिक माहिती अशी की, नोंदणी व मुद्रांक विभाग आतील राजपत्रित अधिकारी संघटना व राजपत्रित अधिकारी संघटना कर्मचारी संघटना यांनी विविध मागण्यांसाठी २८ जुलै रोजी एकदिवसीय लेखणी बंद आंदोलन पुकारत शासनाचे लक्ष वेधले होते. सह जिल्हा निबंधक वर्ग १ निम्न श्रेणी व सह जिल्हा निबंधक वर्ग १ उच्चश्रेणी या दोन संवर्गाचे एकत्रीकरण करुन सहजिल्हा निबंधक वर्ग १ हा एकच संवर्ग तयार करण्यात आला आहे. अन्य मागण्यांबाबत शासन स्तरावरून योग्य ती कार्यवाही सुरू असल्याचे ता. धो. सरावणे कक्ष अधिकारी यांनी कळविले आहे. लेखनी बंद आंदोलनामुळे रजिस्ट्री कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची होणारी संभाव्य गैरसोय टलल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.  ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   संघटनांकडून सकारात्मक प्रतिसाद : सोहम वायाळ  औरंगाबाद विभागाचे उपजिल्हाधिकारी तथा नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक सोहम वायाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की दोन्ही अधिकारी संघटना तसेच कर्मचारी संघटना यांच्या प्रतिनिधी सोबत माझे बोलणे झाले असून त्यांच्या मागण्यांवर लवकरच योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे. संघटनेने त्यास सकारात्मक प्रतिसाद देत आंदोलन स्थगित केल्याचे श्री वायाळ यांनी सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. नोंदणी व मुद्रांक विभाग अ राजपत्रित अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष तथा दुय्यम निबंधक गजू खोत यांनी सकाळ'शी बोलताना सांगितले की, आमच्या विविध मागण्या लवकरात लवकर मान्य करण्याचे आश्वासन राज्य शासनाने आम्हाला दिले आहे .त्यामुळे तूर्तास तरी आम्ही पुकारलेले लेखणी बंद आंदोलन दोन महिने स्थगित करत आहोत. Edited By Pratap Awachar News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, August 4, 2020

नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन अखेर स्थगित..! औरंगाबाद : राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील राजपत्रित अधिकारी तसेच अ-राजपत्रित अधिकारी संघटना आणि कर्मचारी संघटनेतर्फे मंगळवार (ता.०४) चार वाजेपासून विविध प्रलंबित मागण्यांसाठी बे-मुदत लेखणी बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. मागण्या दोन महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन राज्य शासनाने संघटनांना दिल्याने तूर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. संघटनेचे राज्य अध्यक्ष गजू खोत तसेच उपजिल्हाधिकारी तथा नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक सोहम वायाळ यांनी देखील आंदोलन स्थगित झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक    अधिक माहिती अशी की, नोंदणी व मुद्रांक विभाग आतील राजपत्रित अधिकारी संघटना व राजपत्रित अधिकारी संघटना कर्मचारी संघटना यांनी विविध मागण्यांसाठी २८ जुलै रोजी एकदिवसीय लेखणी बंद आंदोलन पुकारत शासनाचे लक्ष वेधले होते. सह जिल्हा निबंधक वर्ग १ निम्न श्रेणी व सह जिल्हा निबंधक वर्ग १ उच्चश्रेणी या दोन संवर्गाचे एकत्रीकरण करुन सहजिल्हा निबंधक वर्ग १ हा एकच संवर्ग तयार करण्यात आला आहे. अन्य मागण्यांबाबत शासन स्तरावरून योग्य ती कार्यवाही सुरू असल्याचे ता. धो. सरावणे कक्ष अधिकारी यांनी कळविले आहे. लेखनी बंद आंदोलनामुळे रजिस्ट्री कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची होणारी संभाव्य गैरसोय टलल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.  ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   संघटनांकडून सकारात्मक प्रतिसाद : सोहम वायाळ  औरंगाबाद विभागाचे उपजिल्हाधिकारी तथा नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक सोहम वायाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की दोन्ही अधिकारी संघटना तसेच कर्मचारी संघटना यांच्या प्रतिनिधी सोबत माझे बोलणे झाले असून त्यांच्या मागण्यांवर लवकरच योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे. संघटनेने त्यास सकारात्मक प्रतिसाद देत आंदोलन स्थगित केल्याचे श्री वायाळ यांनी सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. नोंदणी व मुद्रांक विभाग अ राजपत्रित अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष तथा दुय्यम निबंधक गजू खोत यांनी सकाळ'शी बोलताना सांगितले की, आमच्या विविध मागण्या लवकरात लवकर मान्य करण्याचे आश्वासन राज्य शासनाने आम्हाला दिले आहे .त्यामुळे तूर्तास तरी आम्ही पुकारलेले लेखणी बंद आंदोलन दोन महिने स्थगित करत आहोत. Edited By Pratap Awachar News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2XvnvFL

No comments:

Post a Comment