तिसरी यादी अडकली, शेतकरी चिंतेत..काय आहे प्रकरण? ओरोस (सिंधुदुर्ग) - महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019ची तिसरी यादी तीन महिन्यांहून अधिक काळ रखडली आहे. परिणामी जिल्ह्यातील एक हजार 183 लाभार्थी कर्जमाफी यादीत नाव येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यादीत नाव आले आहे; पण आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने 782 शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी रक्कम जमा होऊ शकली नाही.  ऑगस्ट ते सप्टेंबर या दोन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनाही जाहीर केली होती. त्याचा अध्यादेश 27 डिसेंबरला काढला होता. पहिली यादी 28 फेब्रुवारीला काढण्यात आली. त्यानंतर दुसरी यादी जाहीर केली. जिल्ह्यात या योजनेत 11 हजार 3 शेतकरी पात्र ठरले होते. यातील पहिल्या दोन यादीत मिळून 9 हजार 820 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध केली होती. एक हजार 183 नावे प्रसिद्ध झाली नव्हती. उर्वरित नावे तिसऱ्या यादीत जाहीर करण्यात येतील, असे शासनाने जाहीर केले होते.  अल्प मुदतीचे शेती कर्ज घेत व्याजासह 2 लाख रुपयांची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी जाहीर केली होती. पहिल्या व दुसऱ्या यादीत मिळून नावे प्रसिद्ध झालेल्या शेतकऱ्यांना महा ई-सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करण्याचे बंधन आहे. जिल्ह्यात पहिल्या दोन यादीत मिळून प्रसिद्ध 9 हजार 820 शेतकऱ्यांपैकी 9 हजार 51 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले आहे. 782 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झालेले नाही; मात्र यातील 8 हजार 152 शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी रक्कम जमा झाली आहे. यादीत नाव येऊनही आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने 782 शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी रक्कम जमा झालेली नाही.  आधार प्रमाणीकरण रखडले  मार्चमध्ये दुसरी यादी आली; मात्र त्यानंतर तीन महिने उलटले तरी प्रसिद्ध झालेल्या यादीतील 782 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण होऊ शकलेले नाही. याच काळात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन सुरु झाले. अलीकडे लॉकडाउन उठले तरी आधार केंद्रामध्ये जाण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे आधार प्रमाणीकरण रखडले आहे.  तीन महिन्यांत 85 जणांना रक्कम  कोरोनामुळे सर्वच थांबले आहे. त्याप्रमाणे कर्जमाफीची तिसरी यादी शासनाने जाहीर केलेली नाही. 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील 8 हजार 77 शेतकऱ्यांना 32 कोटी 69 लाख एवढी कर्जमाफी त्यांच्या खात्यात जमा झाली होती. त्यानंतर एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत आणखी केवळ 85 शेतकऱ्यांच्या खात्यात ही कर्जमाफी रक्कम जमा झाली आहे. 38 लाख 25 हजार 315 रुपये एवढी ही रक्कम आहे. परिणामी आतापर्यंत 8 हजार 152 शेतकऱ्यांच्या खात्यात 33 कोटी 7 लाख 25 हजार 315 रुपये एवढी रक्कम जमा झाली आहे. तर यादीत नाव न आलेली 1 हजार 183 आणि यादीत नाव येऊन आधार प्रमाणीकरण न झालेली 782, असे एकूण 1 हजार 965 शेतकरी कर्जमाफीपासून अजून वंचित आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, July 7, 2020

तिसरी यादी अडकली, शेतकरी चिंतेत..काय आहे प्रकरण? ओरोस (सिंधुदुर्ग) - महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019ची तिसरी यादी तीन महिन्यांहून अधिक काळ रखडली आहे. परिणामी जिल्ह्यातील एक हजार 183 लाभार्थी कर्जमाफी यादीत नाव येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यादीत नाव आले आहे; पण आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने 782 शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी रक्कम जमा होऊ शकली नाही.  ऑगस्ट ते सप्टेंबर या दोन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनाही जाहीर केली होती. त्याचा अध्यादेश 27 डिसेंबरला काढला होता. पहिली यादी 28 फेब्रुवारीला काढण्यात आली. त्यानंतर दुसरी यादी जाहीर केली. जिल्ह्यात या योजनेत 11 हजार 3 शेतकरी पात्र ठरले होते. यातील पहिल्या दोन यादीत मिळून 9 हजार 820 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध केली होती. एक हजार 183 नावे प्रसिद्ध झाली नव्हती. उर्वरित नावे तिसऱ्या यादीत जाहीर करण्यात येतील, असे शासनाने जाहीर केले होते.  अल्प मुदतीचे शेती कर्ज घेत व्याजासह 2 लाख रुपयांची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी जाहीर केली होती. पहिल्या व दुसऱ्या यादीत मिळून नावे प्रसिद्ध झालेल्या शेतकऱ्यांना महा ई-सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करण्याचे बंधन आहे. जिल्ह्यात पहिल्या दोन यादीत मिळून प्रसिद्ध 9 हजार 820 शेतकऱ्यांपैकी 9 हजार 51 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले आहे. 782 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झालेले नाही; मात्र यातील 8 हजार 152 शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी रक्कम जमा झाली आहे. यादीत नाव येऊनही आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने 782 शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी रक्कम जमा झालेली नाही.  आधार प्रमाणीकरण रखडले  मार्चमध्ये दुसरी यादी आली; मात्र त्यानंतर तीन महिने उलटले तरी प्रसिद्ध झालेल्या यादीतील 782 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण होऊ शकलेले नाही. याच काळात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन सुरु झाले. अलीकडे लॉकडाउन उठले तरी आधार केंद्रामध्ये जाण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे आधार प्रमाणीकरण रखडले आहे.  तीन महिन्यांत 85 जणांना रक्कम  कोरोनामुळे सर्वच थांबले आहे. त्याप्रमाणे कर्जमाफीची तिसरी यादी शासनाने जाहीर केलेली नाही. 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील 8 हजार 77 शेतकऱ्यांना 32 कोटी 69 लाख एवढी कर्जमाफी त्यांच्या खात्यात जमा झाली होती. त्यानंतर एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत आणखी केवळ 85 शेतकऱ्यांच्या खात्यात ही कर्जमाफी रक्कम जमा झाली आहे. 38 लाख 25 हजार 315 रुपये एवढी ही रक्कम आहे. परिणामी आतापर्यंत 8 हजार 152 शेतकऱ्यांच्या खात्यात 33 कोटी 7 लाख 25 हजार 315 रुपये एवढी रक्कम जमा झाली आहे. तर यादीत नाव न आलेली 1 हजार 183 आणि यादीत नाव येऊन आधार प्रमाणीकरण न झालेली 782, असे एकूण 1 हजार 965 शेतकरी कर्जमाफीपासून अजून वंचित आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2DhE2G1

No comments:

Post a Comment