लाॅकडाउन नियमांना हरताळ अन् पोलिसांचा असा हिसका सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - लॉकडाउन जाहीर केले असताना येथील शहरांमध्ये झालेली गर्दी पाहता पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या 14 जणांवर कारवाई करण्यात आली. आज येथील मच्छीमार्केट परिसरात चिकन घेण्यासाठी झालेली गर्दी पाहता यावेळी पोलिसांनी एका बाजूने गाड्यांची पार्किंग करून गर्दी नियंत्रित केली.  जिल्ह्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे; मात्र असे असतानाही अनेक नागरिक बाजारात खरेदीसाठी दाखल होत आहेत. यामध्ये आश्‍चर्याची बाब म्हणजे गेले दोन-तीन दिवस पोलिसांना काही नागरिक विनामास्क बाजारांमध्ये फिरत आहेत. जिल्ह्यामध्ये सध्या कोरोनाचा वेग वाढत आहे. याला नियंत्रित घालण्यासाठी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी लॉकडाउन जाहीर केले आहे; मात्र तरीही याला हरताळ फासत नागरिक बाजारामध्ये दाखल होत आहेत.  आज रविवार असल्याने येथील मच्छी मार्केट परिसरात नागरिकांची गर्दी होणार असल्याचे लक्षात घेत पोलिसांनी या परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता. यावेळी गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांनी एका बाजूने वाहनांची पार्किंग करून गर्दी नियंत्रित केली. यासाठी सहायक पोलिस निरीक्षक अण्णासो बाबर यांनी विशेष मोहीम राबवली. याशिवाय जयप्रकाश चौक, मुख्य बाजारपेठ याठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. यावेळी विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली. सकाळच्या सुमारास तब्बल 14 जण मास्कशिवाय फिरताना दिसून आले. त्यांच्यावर कारवाई करत दंड ठोठावला. गेल्या दोन दिवसापासून एक शहरांमध्ये गर्दी होत आहे. लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी ते पालन केले; मात्र त्यानंतर लॉकडाउनची एैशी की तैशी करून ठेवली. येथील पोलिस ठाण्यातील आज अण्णासो बाबर हे पोलिस अधिकारी स्पीकरच्याच्या माध्यमातून नागरिकांना सूचना देत होते.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, July 5, 2020

लाॅकडाउन नियमांना हरताळ अन् पोलिसांचा असा हिसका सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - लॉकडाउन जाहीर केले असताना येथील शहरांमध्ये झालेली गर्दी पाहता पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या 14 जणांवर कारवाई करण्यात आली. आज येथील मच्छीमार्केट परिसरात चिकन घेण्यासाठी झालेली गर्दी पाहता यावेळी पोलिसांनी एका बाजूने गाड्यांची पार्किंग करून गर्दी नियंत्रित केली.  जिल्ह्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे; मात्र असे असतानाही अनेक नागरिक बाजारात खरेदीसाठी दाखल होत आहेत. यामध्ये आश्‍चर्याची बाब म्हणजे गेले दोन-तीन दिवस पोलिसांना काही नागरिक विनामास्क बाजारांमध्ये फिरत आहेत. जिल्ह्यामध्ये सध्या कोरोनाचा वेग वाढत आहे. याला नियंत्रित घालण्यासाठी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी लॉकडाउन जाहीर केले आहे; मात्र तरीही याला हरताळ फासत नागरिक बाजारामध्ये दाखल होत आहेत.  आज रविवार असल्याने येथील मच्छी मार्केट परिसरात नागरिकांची गर्दी होणार असल्याचे लक्षात घेत पोलिसांनी या परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता. यावेळी गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांनी एका बाजूने वाहनांची पार्किंग करून गर्दी नियंत्रित केली. यासाठी सहायक पोलिस निरीक्षक अण्णासो बाबर यांनी विशेष मोहीम राबवली. याशिवाय जयप्रकाश चौक, मुख्य बाजारपेठ याठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. यावेळी विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली. सकाळच्या सुमारास तब्बल 14 जण मास्कशिवाय फिरताना दिसून आले. त्यांच्यावर कारवाई करत दंड ठोठावला. गेल्या दोन दिवसापासून एक शहरांमध्ये गर्दी होत आहे. लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी ते पालन केले; मात्र त्यानंतर लॉकडाउनची एैशी की तैशी करून ठेवली. येथील पोलिस ठाण्यातील आज अण्णासो बाबर हे पोलिस अधिकारी स्पीकरच्याच्या माध्यमातून नागरिकांना सूचना देत होते.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3iB1e22

No comments:

Post a Comment