Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, May 30, 2020

तुकाराम मुंढे हुकुमशाहसारखे वागतात, नागपुरातील या कॉंग्रेसे आमदाराने डागली तोफ

नागपूर : लोकप्रतिनीधींचे ऐकायचे नाही, जनतेच्या अडचणी समजून घ्यायच्या नाही, प्रतिबंधित क्षेत्राच्या नावाखील लोकांना महिनाभर डांबून ठेवायचे, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करायची नाही आणि भक्तांमार्फत सोशल मीडियावर स्वतःला नागपूरचा राजा म्हणून घ्यायचे, असे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचे धोरण आहे. त्यामुळे असा हेकेखोर राजा आम्हाला नको आहे. याचा हिशेब आपण अधिवेशनात घेऊ असा इशारा कॉंग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी दिला.

विकास ठाकरे यांनी शनिवारी सकाळ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते म्हणाले, मुंढे यांना वैयक्तिक विरोध करीत नाही. मात्र ते ज्या पद्धतीने वागतात, काम करतात त्याला माझा विरोध आहे. मी त्यांच्याकडे लोकांच्या तक्रारी आल्यावर लोकप्रतिनिधी म्हणून जातो. त्या समजून घेण्याऐवजी आपणच कसे बरोबर आहोत यावरच त्यांचा भर असतो.

कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर ट्रस्ट ले-आऊटसह सुमारे पाच किलोमीटरचा परिसर त्यांनी बंद केला. त्याआधी लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या अडचणी, गैरसोयी जाणून घेतल्या नाहीत. डॉक्‍टर्स, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी यांनाही बाहेर पडू दिले नाही. नियमानुसार लॉकडाऊन करताना तेथील नागरिकांना सोयीसुविधा पुरवाव्या हा नियम आहे. तो त्यांनी मान्य केला नाही. आता ट्रस्ट ले-आऊट वगळून इतर वस्त्यांना प्रतिबंधित क्षेत्रातून वगळले. हीच मागणी आपण करीत होतो. आता कोण चुकले हे मुंडे यांनीच सांगावे.

अवश्य वाचा - ब्रेकिंग...मुंबईवरून आलेल्या कोरोनाग्रस्ताचा यवतमाळात मृत्यू

पब्लिसिटी क्रेझी

मुंढे पगारी नोकरदार आहे. राज्य सरकारच्या सर्व सोयीसुविधा घेतात. सरकारच्याच योजनांची त्यांना अंमलबजावणी करायची असते. मात्र ते मुंढे पॅटर्न म्हणून स्वतःचा प्रचार करतात. राज्यात महाआघाडीचे सरकार आहे. याचे श्रेयही ते सरकारला देत नाही. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी त्यांनी एजन्सी नियुक्त केली आहे. यावर त्यांचे भक्त वेगवेगळ्या पोजचे फोटो टाकतात. "नागपूरचा राजा' म्हणतात. यावर त्यांनी सरकारचा प्रतिनिधी म्हणून कधी आक्षेप घेतला नाही. सरकारची नोकरी करतो असे म्हटले नाही. यावरून सर्वच मुंढेंच्या सहमतीने सुरू असल्याचे स्पष्ट होते. एवढीच प्रसिद्धी आणि समाजसेवेची खुमखुमी असेल तर मुंढे यांनी नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात यावे, असेही ठाकरे म्हणाले.

गुन्हे दाखल करण्याच्या धमक्‍या

कॉंग्रसेच्या एका नगरसेवकाने नागरिकांना विलिकरणासाठी दोन तासाची मुदत मागितली होती. मात्र मुंढे यांच्या आदेशावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आपणावरसुद्धा गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. पालकमंत्री, महापौर, आमदारांचेही ते ऐकत नाही. रचना अपार्टमेंट येथील एक इमारतील त्यांनी क्वारंटाईन सेंटर सुरू केले. याच इमारतीला लागून असलेल्या फ्लॅटमध्ये दीडशे कुटुंब राहातात. त्यांचा विरोध स्वाभाविक होता. मात्र त्यांनाही हाकलून लावले, असे ठाकरे यांनी सांगितले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

तुकाराम मुंढे हुकुमशाहसारखे वागतात, नागपुरातील या कॉंग्रेसे आमदाराने डागली तोफ नागपूर : लोकप्रतिनीधींचे ऐकायचे नाही, जनतेच्या अडचणी समजून घ्यायच्या नाही, प्रतिबंधित क्षेत्राच्या नावाखील लोकांना महिनाभर डांबून ठेवायचे, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करायची नाही आणि भक्तांमार्फत सोशल मीडियावर स्वतःला नागपूरचा राजा म्हणून घ्यायचे, असे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचे धोरण आहे. त्यामुळे असा हेकेखोर राजा आम्हाला नको आहे. याचा हिशेब आपण अधिवेशनात घेऊ असा इशारा कॉंग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी दिला. विकास ठाकरे यांनी शनिवारी सकाळ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते म्हणाले, मुंढे यांना वैयक्तिक विरोध करीत नाही. मात्र ते ज्या पद्धतीने वागतात, काम करतात त्याला माझा विरोध आहे. मी त्यांच्याकडे लोकांच्या तक्रारी आल्यावर लोकप्रतिनिधी म्हणून जातो. त्या समजून घेण्याऐवजी आपणच कसे बरोबर आहोत यावरच त्यांचा भर असतो. कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर ट्रस्ट ले-आऊटसह सुमारे पाच किलोमीटरचा परिसर त्यांनी बंद केला. त्याआधी लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या अडचणी, गैरसोयी जाणून घेतल्या नाहीत. डॉक्‍टर्स, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी यांनाही बाहेर पडू दिले नाही. नियमानुसार लॉकडाऊन करताना तेथील नागरिकांना सोयीसुविधा पुरवाव्या हा नियम आहे. तो त्यांनी मान्य केला नाही. आता ट्रस्ट ले-आऊट वगळून इतर वस्त्यांना प्रतिबंधित क्षेत्रातून वगळले. हीच मागणी आपण करीत होतो. आता कोण चुकले हे मुंडे यांनीच सांगावे. अवश्य वाचा - ब्रेकिंग...मुंबईवरून आलेल्या कोरोनाग्रस्ताचा यवतमाळात मृत्यू पब्लिसिटी क्रेझी मुंढे पगारी नोकरदार आहे. राज्य सरकारच्या सर्व सोयीसुविधा घेतात. सरकारच्याच योजनांची त्यांना अंमलबजावणी करायची असते. मात्र ते मुंढे पॅटर्न म्हणून स्वतःचा प्रचार करतात. राज्यात महाआघाडीचे सरकार आहे. याचे श्रेयही ते सरकारला देत नाही. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी त्यांनी एजन्सी नियुक्त केली आहे. यावर त्यांचे भक्त वेगवेगळ्या पोजचे फोटो टाकतात. "नागपूरचा राजा' म्हणतात. यावर त्यांनी सरकारचा प्रतिनिधी म्हणून कधी आक्षेप घेतला नाही. सरकारची नोकरी करतो असे म्हटले नाही. यावरून सर्वच मुंढेंच्या सहमतीने सुरू असल्याचे स्पष्ट होते. एवढीच प्रसिद्धी आणि समाजसेवेची खुमखुमी असेल तर मुंढे यांनी नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात यावे, असेही ठाकरे म्हणाले. गुन्हे दाखल करण्याच्या धमक्‍या कॉंग्रसेच्या एका नगरसेवकाने नागरिकांना विलिकरणासाठी दोन तासाची मुदत मागितली होती. मात्र मुंढे यांच्या आदेशावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आपणावरसुद्धा गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. पालकमंत्री, महापौर, आमदारांचेही ते ऐकत नाही. रचना अपार्टमेंट येथील एक इमारतील त्यांनी क्वारंटाईन सेंटर सुरू केले. याच इमारतीला लागून असलेल्या फ्लॅटमध्ये दीडशे कुटुंब राहातात. त्यांचा विरोध स्वाभाविक होता. मात्र त्यांनाही हाकलून लावले, असे ठाकरे यांनी सांगितले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cggpJW
Read More
जयंती विशेष : अहल्याबाई होळकरांच्या सवतींचे काय झाले? जाणून घ्या...

औरंगाबाद : पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांची आज (ता. ३१ मे) जयंती. स्वाभिमानी राज्यकर्ती म्हणून त्या जगल्या. या लोकमातेने मालव्याच्या प्रांतावर २८ वर्षे लोककल्याणकारी राज्य केले. आजही त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्याविषयी खास माहिती eSakal.com च्या वाचकांसाठी.  

अहल्याबाईंचे पती खंडेराव होळकर हे सुभेदार मल्हारराव व गौतमाबाई यांचे पुत्र. त्यांचा जन्म २ जानेवारी १७२३ ला झाला. अहल्याबाईंशी त्यांचे २१ मार्च १७३८ ला लग्न झाले. त्यावेळी अहल्याबाई आठ वर्षांच्या होत्या. अहल्याबाईंसह खंडेरावांना चार बायका होत्या. खंडेराव यांना कुम्हेर येथे एका लढाईदरम्यान १९ मार्च १७५४ ला वीरमरण आले. त्यांच्या चार बायकांपैकी पुण्यश्लोक अहल्याबाई वगळता इतर तिघी सती गेल्या. पार्वतीबाई पीताबाई आणि सुरताबाई अशी त्यांची नावे आहेत. 

सासऱ्यांनी जाऊ दिले नाही सती

अहल्याबाई याच होळकर घराण्याचे नाव लौकिक करतील. त्या उत्तम प्रशासक आहेत. त्यांना समाजभान आहे, हे त्यांचे सासरे मल्हाररावांनी हेरले होते. त्यामुळेच त्यांनी अहल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. पुढे १२ वर्षांनंतर मल्हारराव होळकर यांचा मृत्यू झाल्यानंतर अहल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. लढाईत त्या स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली. राणी अहल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले. त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.  

सतत ऑनलाइन असाल तर सावधान! जडताहेत हे आजार...
 

असे गेले बालपण

अहल्याबाईंचा जन्म ३१ मे १७२५ ला पूर्वीच्या बीड, तर आताच्या अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या चौंडी (ता. जामखेड) या गावी झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. अहल्याबाईंचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी. त्यांच्या मामांचे आडनाव मैंदाड. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना मोडी लिपीतून लिहिण्या-वाचण्यास शिकविले होते. त्यांच्या आईचे नाव सुशीलाबाई होते. माणकोजी शिदे आणि सुशीलाबाई या दांपत्याला महादजी, येसाजी, बाणाजी, विठोजी आणि सुभनजी अशी पाच मुले आणि एक मुलगी होती. ती मुलगी म्हणजे अहल्याबाई. एकुलती एक मुलगी असल्याने त्यांचे बालपण लाडात गेले. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जयंती विशेष : अहल्याबाई होळकरांच्या सवतींचे काय झाले? जाणून घ्या... औरंगाबाद : पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांची आज (ता. ३१ मे) जयंती. स्वाभिमानी राज्यकर्ती म्हणून त्या जगल्या. या लोकमातेने मालव्याच्या प्रांतावर २८ वर्षे लोककल्याणकारी राज्य केले. आजही त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्याविषयी खास माहिती eSakal.com च्या वाचकांसाठी.   अहल्याबाईंचे पती खंडेराव होळकर हे सुभेदार मल्हारराव व गौतमाबाई यांचे पुत्र. त्यांचा जन्म २ जानेवारी १७२३ ला झाला. अहल्याबाईंशी त्यांचे २१ मार्च १७३८ ला लग्न झाले. त्यावेळी अहल्याबाई आठ वर्षांच्या होत्या. अहल्याबाईंसह खंडेरावांना चार बायका होत्या. खंडेराव यांना कुम्हेर येथे एका लढाईदरम्यान १९ मार्च १७५४ ला वीरमरण आले. त्यांच्या चार बायकांपैकी पुण्यश्लोक अहल्याबाई वगळता इतर तिघी सती गेल्या. पार्वतीबाई पीताबाई आणि सुरताबाई अशी त्यांची नावे आहेत.  सासऱ्यांनी जाऊ दिले नाही सती अहल्याबाई याच होळकर घराण्याचे नाव लौकिक करतील. त्या उत्तम प्रशासक आहेत. त्यांना समाजभान आहे, हे त्यांचे सासरे मल्हाररावांनी हेरले होते. त्यामुळेच त्यांनी अहल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. पुढे १२ वर्षांनंतर मल्हारराव होळकर यांचा मृत्यू झाल्यानंतर अहल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. लढाईत त्या स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली. राणी अहल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले. त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.   सतत ऑनलाइन असाल तर सावधान! जडताहेत हे आजार...   असे गेले बालपण अहल्याबाईंचा जन्म ३१ मे १७२५ ला पूर्वीच्या बीड, तर आताच्या अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या चौंडी (ता. जामखेड) या गावी झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. अहल्याबाईंचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी. त्यांच्या मामांचे आडनाव मैंदाड. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना मोडी लिपीतून लिहिण्या-वाचण्यास शिकविले होते. त्यांच्या आईचे नाव सुशीलाबाई होते. माणकोजी शिदे आणि सुशीलाबाई या दांपत्याला महादजी, येसाजी, बाणाजी, विठोजी आणि सुभनजी अशी पाच मुले आणि एक मुलगी होती. ती मुलगी म्हणजे अहल्याबाई. एकुलती एक मुलगी असल्याने त्यांचे बालपण लाडात गेले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3etBhPc
Read More
लवकरच ट्रॅकवर धावेल नागपूर मेट्रो, अशा असतील प्रवासाच्या अटी

नागपूर : केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवितानाच परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी शिथिलताही दिली. शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याबाबतचे अधिकार राज्य सरकारकडे देण्यात आले आहे. त्यामुळे शहरात आपली बस, मेट्रो सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, नागपूरकरांचा प्रवास आता कोरोनापूर्वीच्या काळानुसार नव्हे तर कोरोनाच्या सावटात अनेक अटींसह प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे नागपूरकरांना जुन्याच आपली बस, मेट्रोमधून प्रवासाचा नवा अनुभव येणार आहे.

मार्च 11 रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर शहरातील मेट्रो सेवा, आपली बस बंद करण्यात आली. गेल्या अडीच महिन्यांपासून शहरातील सार्वजनिक वाहतूक बंद आहे. मात्र, लॉकडाऊन चारमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्याने नागरिक आता कामावर जात आहेत. खाजगी वाहनांचाही वापर होत आहे. केंद्र सरकारने आज लॉकडाऊन पाचची घोषणा केली असून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र वगळल्यास सर्वच भागात सर्वच सेवा सुरू करण्याचे स्पष्ट केले आहे.

अवश्य वाचा - ब्रेकिंग...मुंबईवरून आलेल्या कोरोनाग्रस्ताचा यवतमाळात मृत्यू

शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच टप्प्या-टप्प्याने सर्व सेवा सुरू करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आता कोरोना रुग्णांमुळे प्रतिबंधित करण्यात आलेले क्षेत्र वगळून इतर भागात सार्वजनिक वाहतूकीचाही मार्ग मोकळा झाला. ही सेवा कधीपासून सुरू करणार? याबाबत अद्याप निर्णय झाला नसला तरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारा मजूर वर्ग, कामगार, खाजगी कार्यालयातील कर्मचारी बस, मेट्रोची प्रतीक्षा करीत आहेत. मात्र आता नागपूरकरांचा प्रवास कोरोनाच्या सावटातच होणार असल्याने प्रवासासाठी अनेक अटींचा सामना करावा लागणार आहे.

बसमध्ये प्रवासासाठी अटी व उपाययोजना

- दररोज प्रत्येक बसमधील आसनांची फेरीनंतर स्वच्छता.

- प्रवाशांना मास्क लावणे बंधनकारक

- एका आसनावर एकच प्रवासी

- बसमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे पालन बंधनकारक.

मेट्रोमधून प्रवासासाठी अटी व उपाययोजना

- सोशल डिस्टनिसंगचे पालन करावे लागणार.

- मास्कचा वापर करणे बंधनकारक

- संपूर्ण मेट्रो ट्रेनचे सॅनिटायझेशन

- लिफ्ट, एस्केलेटर्सवर हात ठेवता येणार नाही.

 

सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याचा विचार आहे. मात्र बसची स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, आसनावर बसण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्यात येत आहेत. बसमध्ये नेमके किती प्रवासी राहतील याबाबतही विचार केला आहे. ही सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येईल, परंतु सध्याच वेळापत्रक सांगता येणार नाही.
- तुकाराम मुंढे, आयुक्त, महापालिका.

आपली बसमध्ये अनेक गरीब, मजूर वर्ग प्रवास करतो. आता बांधकाम, खाजगी कार्यालयेही काही प्रमाणात सुरू झाले. येथील कर्मचारी, मजुरांना ये-जा करण्यासाठी आपली बस सुरू करण्याबाबत आयुक्तांना पत्र देणार आहे. प्रशासनाने याबाबत मार्गदर्शक तत्व तयार करून लवकर बससेवा सुरू करावी.
- बाल्या बोरकर, सभापती, परिवहन समिती, महापालिका.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लवकरच ट्रॅकवर धावेल नागपूर मेट्रो, अशा असतील प्रवासाच्या अटी नागपूर : केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवितानाच परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी शिथिलताही दिली. शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याबाबतचे अधिकार राज्य सरकारकडे देण्यात आले आहे. त्यामुळे शहरात आपली बस, मेट्रो सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, नागपूरकरांचा प्रवास आता कोरोनापूर्वीच्या काळानुसार नव्हे तर कोरोनाच्या सावटात अनेक अटींसह प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे नागपूरकरांना जुन्याच आपली बस, मेट्रोमधून प्रवासाचा नवा अनुभव येणार आहे. मार्च 11 रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर शहरातील मेट्रो सेवा, आपली बस बंद करण्यात आली. गेल्या अडीच महिन्यांपासून शहरातील सार्वजनिक वाहतूक बंद आहे. मात्र, लॉकडाऊन चारमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्याने नागरिक आता कामावर जात आहेत. खाजगी वाहनांचाही वापर होत आहे. केंद्र सरकारने आज लॉकडाऊन पाचची घोषणा केली असून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र वगळल्यास सर्वच भागात सर्वच सेवा सुरू करण्याचे स्पष्ट केले आहे. अवश्य वाचा - ब्रेकिंग...मुंबईवरून आलेल्या कोरोनाग्रस्ताचा यवतमाळात मृत्यू शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच टप्प्या-टप्प्याने सर्व सेवा सुरू करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आता कोरोना रुग्णांमुळे प्रतिबंधित करण्यात आलेले क्षेत्र वगळून इतर भागात सार्वजनिक वाहतूकीचाही मार्ग मोकळा झाला. ही सेवा कधीपासून सुरू करणार? याबाबत अद्याप निर्णय झाला नसला तरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारा मजूर वर्ग, कामगार, खाजगी कार्यालयातील कर्मचारी बस, मेट्रोची प्रतीक्षा करीत आहेत. मात्र आता नागपूरकरांचा प्रवास कोरोनाच्या सावटातच होणार असल्याने प्रवासासाठी अनेक अटींचा सामना करावा लागणार आहे. बसमध्ये प्रवासासाठी अटी व उपाययोजना - दररोज प्रत्येक बसमधील आसनांची फेरीनंतर स्वच्छता. - प्रवाशांना मास्क लावणे बंधनकारक - एका आसनावर एकच प्रवासी - बसमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे पालन बंधनकारक. मेट्रोमधून प्रवासासाठी अटी व उपाययोजना - सोशल डिस्टनिसंगचे पालन करावे लागणार. - मास्कचा वापर करणे बंधनकारक - संपूर्ण मेट्रो ट्रेनचे सॅनिटायझेशन - लिफ्ट, एस्केलेटर्सवर हात ठेवता येणार नाही.   सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याचा विचार आहे. मात्र बसची स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, आसनावर बसण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्यात येत आहेत. बसमध्ये नेमके किती प्रवासी राहतील याबाबतही विचार केला आहे. ही सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येईल, परंतु सध्याच वेळापत्रक सांगता येणार नाही. - तुकाराम मुंढे, आयुक्त, महापालिका. आपली बसमध्ये अनेक गरीब, मजूर वर्ग प्रवास करतो. आता बांधकाम, खाजगी कार्यालयेही काही प्रमाणात सुरू झाले. येथील कर्मचारी, मजुरांना ये-जा करण्यासाठी आपली बस सुरू करण्याबाबत आयुक्तांना पत्र देणार आहे. प्रशासनाने याबाबत मार्गदर्शक तत्व तयार करून लवकर बससेवा सुरू करावी. - बाल्या बोरकर, सभापती, परिवहन समिती, महापालिका. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cgcEnO
Read More
कणकवली आगाराबाबत संताप, कारण....

सिंधुदुर्गनगरी - शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी कणकवली आगारातून सोडण्यात येणाऱ्या एसटी बसच्या वेळेमध्ये बदल केल्याने कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश होऊनही त्यामध्ये कोणती सुधारणा होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यालयाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी कणकवली बस स्थानकावरून एसटी बस सोडण्यात आली तर या बसमध्ये सामाजिक अंतर ठेवून 33 प्रवासी वाहतूक करण्याबाबत आदेश देण्यात आले; मात्र एसटी महामंडळाकडून नियमांचे उल्लंघन करत प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होत असल्याबाबत शासकीय कर्मचाऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांची लक्ष वेधले होते. कणकवलीवरून सिंधुदुर्गनगरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याने दोन एसटी बस सोडण्याची व्यवस्था करण्याबाबत आदेश दिले होते. तरीही कणकवली एसटी प्रशासनाकडून एकच बस सोडण्यात येत आहे. या बसमध्ये सामाजिक अंतर न ठेवता अधिक प्रवाशांची वाहतूक करून नियमांचे उल्लंघन होत आहे. 

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून जिल्ह्यात रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सेवेत असलेले काही कर्मचारी कणकवलीतुन त्याच एसटी बसमधून प्रवास करीत आहेत. या कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोरोना रुग्णाशी संपर्क येत आहे. त्यांच्यापासून अन्न कर्मचाऱ्यांना बाधा होण्याची शक्‍यता आहे. तरी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी एसटीची स्वतंत्र व्यवस्था करावी तसेच मुख्यालय कर्मचाऱ्यांसाठी सोडण्यात आलेल्या सकाळी सव्वानऊ वाजता व सायंकाळी साडेसहा वाजता सुटणाऱ्या बसच्या वेळेत बदल करण्यात येऊन तो सकाळी नऊ वाजता व सायंकाळी पावणेसहा वाजता, अशी केली असून ती चुकीची आहे. 

अपर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 
कार्यालय सुटण्यापूर्वी बस निघून जात असल्याने कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. याबाबत कर्मचाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता ही बस कार्यालयीन वेळेनुसार सकाळी सव्वानऊ वाजता व सायंकाळी साडेसहा वाजता सोडावी व ही बस विनाथांबा करण्यात यावी. त्यामध्ये सामाजिक अंतर राखण्यात यावे, असे आदेश अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी एसटी विभाग नियंत्रक कणकवली यांना दिले आहेत. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कणकवली आगाराबाबत संताप, कारण.... सिंधुदुर्गनगरी - शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी कणकवली आगारातून सोडण्यात येणाऱ्या एसटी बसच्या वेळेमध्ये बदल केल्याने कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश होऊनही त्यामध्ये कोणती सुधारणा होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यालयाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी कणकवली बस स्थानकावरून एसटी बस सोडण्यात आली तर या बसमध्ये सामाजिक अंतर ठेवून 33 प्रवासी वाहतूक करण्याबाबत आदेश देण्यात आले; मात्र एसटी महामंडळाकडून नियमांचे उल्लंघन करत प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होत असल्याबाबत शासकीय कर्मचाऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांची लक्ष वेधले होते. कणकवलीवरून सिंधुदुर्गनगरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याने दोन एसटी बस सोडण्याची व्यवस्था करण्याबाबत आदेश दिले होते. तरीही कणकवली एसटी प्रशासनाकडून एकच बस सोडण्यात येत आहे. या बसमध्ये सामाजिक अंतर न ठेवता अधिक प्रवाशांची वाहतूक करून नियमांचे उल्लंघन होत आहे.  सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून जिल्ह्यात रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सेवेत असलेले काही कर्मचारी कणकवलीतुन त्याच एसटी बसमधून प्रवास करीत आहेत. या कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोरोना रुग्णाशी संपर्क येत आहे. त्यांच्यापासून अन्न कर्मचाऱ्यांना बाधा होण्याची शक्‍यता आहे. तरी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी एसटीची स्वतंत्र व्यवस्था करावी तसेच मुख्यालय कर्मचाऱ्यांसाठी सोडण्यात आलेल्या सकाळी सव्वानऊ वाजता व सायंकाळी साडेसहा वाजता सुटणाऱ्या बसच्या वेळेत बदल करण्यात येऊन तो सकाळी नऊ वाजता व सायंकाळी पावणेसहा वाजता, अशी केली असून ती चुकीची आहे.  अपर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश  कार्यालय सुटण्यापूर्वी बस निघून जात असल्याने कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. याबाबत कर्मचाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता ही बस कार्यालयीन वेळेनुसार सकाळी सव्वानऊ वाजता व सायंकाळी साडेसहा वाजता सोडावी व ही बस विनाथांबा करण्यात यावी. त्यामध्ये सामाजिक अंतर राखण्यात यावे, असे आदेश अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी एसटी विभाग नियंत्रक कणकवली यांना दिले आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MegHGz
Read More
भावांनो जिंकला! करोना संकटात 27 रुग्णवाहिका चालकांची कामगिरी गौरवास्पद

ओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोना विरुद्धच्या लढ्यात डॉक्‍टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस यांच्यासह 108 रुग्णवाहिकेतील चालकांचे योगदानही महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात आणण्यापासून ते डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यापर्यंत 108 रुग्णवाहिका कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मार्च ते आतापर्यंत 108 रुग्णवाहिकेतून 2 हजार 321 कोरोना संशयित रुग्णांना जिल्हा रुग्णालयात आणले आहे.

यात 30 कोरोना 38 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. एप्रिल 2019 ते मार्च 2020 या कालावधीत अपघात, गरोदर स्त्री, आत्महत्या, वीज पडणे यांसह अन्य 12 हजार 495 रुग्णांना सेवा देऊन त्यांचे प्राण वाचवले आहेत. कोरोना लढ्यात डॉक्‍टर, पोलिस, शिक्षक, सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी यांसह अन्य शासकीय कर्मचारी उतरले आहेत. या लढ्यात 108 रुग्णवाहिका कर्मचारीही सहभागी आहेत. जिल्ह्यात 108 च्या 12 रुग्णवाहिका आहेत. कणकवली, कासार्डे, वैभववाडी, ओरोस, कुडाळ, सावंतवाडी, आंबोली, दोडामार्ग, वेंगुर्ला येथील रुग्णालयात या रुग्णवाहिका आहेत.

या रुग्णवाहिकामध्ये 27 चालक आहेत. कोरोना रुग्ण असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना क्वारंटाईन केलेल्या ठिकाणावरून जिल्हा रुग्णालयात आणण्याचे काम 108चे "पायलट' करत आहेत. सध्या कोरोनामुळे शहरी भागातून ते अगदी ग्रामीण भागापर्यंत या रुग्णवाहिका जात आहेत. साधारणपणे एक रुग्णवाहिका 175 ते 200 किलोमीटर प्रवास करीत आहे. जिल्ह्यात परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या पाहता आरोग्य सेवेवर ताण पडत आहे. त्यामुळे आणखीन 5 रुग्णवाहिका सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मिळाव्यात, अशी मागणी स्थानिक रुग्णालय प्रशासनाने आरोग्य संचालक यांच्याकडे केली आहे. 

योद्‌ध्यांचा विचार व्हावा 
कोरोनावर भविष्यात निश्‍चित मात करू; परंतु या कठीण परिस्थितीत ज्यांनी जीव धोक्‍यात घालून इतरांचा जीव वाचविण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. अशा योद्‌ध्यांना शासनाने विसरू नये. रुग्णवाहिकेचे चालक सध्या कॉन्ट्रॅक्‍ट बेसवर आहेत. भविष्यात शासकीय सेवेत कायमस्वरूपी करून घ्यावे, अशी एक माफक इच्छा या रुग्णवाहिका चालकांकडून व्यक्त केली जात आहे. 

तापमान, त्यात पीपीई किट 
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका वाढत चालला आहे. अंगाची ल्हाई ल्हाई होत आहे. जिल्ह्यात 41 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान गेल्याच्या नोंदी आहेत. त्यातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव. यामुळे 108 रुग्णवाहिकेतील कर्मचारी स्वरक्षणासाठी 14 ते 15 तास पीपीई किट घालून डॉक्‍टरांसोबत संशयित व पॉझिटिव्ह रुग्णांना आणावे लागत आहे. 

पूरस्थितीतही महत्त्वाची भूमिका 
गतवर्षीच्या महापूर आठवला, की आजही धडकी भरते. अशा पूरस्थितीत 108 च्या चालकांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. स्वतःचा जीव धोक्‍यात घालून कमरेएवढ्या पाण्यात रुग्णवाहिका घालून अनेकांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यामुळे या योद्धांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांचा गौरव व्हावा, असे काहींनी मत व्यक्त केले. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

भावांनो जिंकला! करोना संकटात 27 रुग्णवाहिका चालकांची कामगिरी गौरवास्पद ओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोना विरुद्धच्या लढ्यात डॉक्‍टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस यांच्यासह 108 रुग्णवाहिकेतील चालकांचे योगदानही महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात आणण्यापासून ते डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यापर्यंत 108 रुग्णवाहिका कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मार्च ते आतापर्यंत 108 रुग्णवाहिकेतून 2 हजार 321 कोरोना संशयित रुग्णांना जिल्हा रुग्णालयात आणले आहे. यात 30 कोरोना 38 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. एप्रिल 2019 ते मार्च 2020 या कालावधीत अपघात, गरोदर स्त्री, आत्महत्या, वीज पडणे यांसह अन्य 12 हजार 495 रुग्णांना सेवा देऊन त्यांचे प्राण वाचवले आहेत. कोरोना लढ्यात डॉक्‍टर, पोलिस, शिक्षक, सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी यांसह अन्य शासकीय कर्मचारी उतरले आहेत. या लढ्यात 108 रुग्णवाहिका कर्मचारीही सहभागी आहेत. जिल्ह्यात 108 च्या 12 रुग्णवाहिका आहेत. कणकवली, कासार्डे, वैभववाडी, ओरोस, कुडाळ, सावंतवाडी, आंबोली, दोडामार्ग, वेंगुर्ला येथील रुग्णालयात या रुग्णवाहिका आहेत. या रुग्णवाहिकामध्ये 27 चालक आहेत. कोरोना रुग्ण असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना क्वारंटाईन केलेल्या ठिकाणावरून जिल्हा रुग्णालयात आणण्याचे काम 108चे "पायलट' करत आहेत. सध्या कोरोनामुळे शहरी भागातून ते अगदी ग्रामीण भागापर्यंत या रुग्णवाहिका जात आहेत. साधारणपणे एक रुग्णवाहिका 175 ते 200 किलोमीटर प्रवास करीत आहे. जिल्ह्यात परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या पाहता आरोग्य सेवेवर ताण पडत आहे. त्यामुळे आणखीन 5 रुग्णवाहिका सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मिळाव्यात, अशी मागणी स्थानिक रुग्णालय प्रशासनाने आरोग्य संचालक यांच्याकडे केली आहे.  योद्‌ध्यांचा विचार व्हावा  कोरोनावर भविष्यात निश्‍चित मात करू; परंतु या कठीण परिस्थितीत ज्यांनी जीव धोक्‍यात घालून इतरांचा जीव वाचविण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. अशा योद्‌ध्यांना शासनाने विसरू नये. रुग्णवाहिकेचे चालक सध्या कॉन्ट्रॅक्‍ट बेसवर आहेत. भविष्यात शासकीय सेवेत कायमस्वरूपी करून घ्यावे, अशी एक माफक इच्छा या रुग्णवाहिका चालकांकडून व्यक्त केली जात आहे.  तापमान, त्यात पीपीई किट  सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका वाढत चालला आहे. अंगाची ल्हाई ल्हाई होत आहे. जिल्ह्यात 41 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान गेल्याच्या नोंदी आहेत. त्यातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव. यामुळे 108 रुग्णवाहिकेतील कर्मचारी स्वरक्षणासाठी 14 ते 15 तास पीपीई किट घालून डॉक्‍टरांसोबत संशयित व पॉझिटिव्ह रुग्णांना आणावे लागत आहे.  पूरस्थितीतही महत्त्वाची भूमिका  गतवर्षीच्या महापूर आठवला, की आजही धडकी भरते. अशा पूरस्थितीत 108 च्या चालकांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. स्वतःचा जीव धोक्‍यात घालून कमरेएवढ्या पाण्यात रुग्णवाहिका घालून अनेकांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यामुळे या योद्धांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांचा गौरव व्हावा, असे काहींनी मत व्यक्त केले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZRc2Cl
Read More
लॅबबाबत खुशाल राजकारण करा - उदय सामंत

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यासाठी मंजूर झालेली कोरोना तपासणी लॅब सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयात येत्या पंधरा ते वीस दिवसांत सुरू होईल. यामध्ये कोणतेही राजकारण नसून लॅब व्हावी एवढेच आपले प्रामाणिक प्रयत्न आहेत. ज्यांना राजकारण करायचं त्यांनी ते खुशाल करावे असा सल्ला पालकमंत्री उदय सामंत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांना दिला. 

पालकमंत्री सामंत यांनी रत्नागिरी येथून झूम ऍपच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना पालकमंत्री सामंत यांनी, रत्नागिरीमध्ये कोरोना तपासणी लॅब मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गमधीलही कोरोना तपासणी लॅबला मंजुरी दिली आहे. आपल्या जिल्ह्यातुन पूर्ण कागदपत्रांसह पाठविलेला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी केवळ चार दिवसात मंजूर केला आहे. या मंजुरीसाठी खासदार विनायक राऊत यांनी चांगला पाठपुरावा केला. ते मुंबईत असल्याने त्यांनी सिंधुदुर्गात लॅब व्हावी यासाठी प्रयत्न केले. त्यांना आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनीही चांगले सहकार्य केले असे सांगितले. 

या लॅब संदर्भातील नियमावली उद्यापर्यंत जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त होईल. यासाठी 61 ते 65 लाख रुपयांपर्यंतचे कोटेशन प्राप्त झाले असून, हा सर्व निधी जिल्हा नियोजन समितीमधून देण्यात येणार आहे. तशी मान्यता ही घेतली आहे. या लॅबसाठी अजून निधी लागल्यास तोही जिल्हा नियोजन मधून देण्यात येईल. ही लॅब पंधरा ते वीस दिवसांमध्ये सुरू होईल असा विश्वासही सामंत यांनी व्यक्त केला. 

खासगी ठिकाणी लॅब झाल्यास त्या लॅबमधून तपासणीसाठी पैसे मोजावे लागणार होते. त्यापेक्षा शासकीय लॅब होणे अधिक चांगले. असे सांगतानाच काहीजण माहितीच्या अधिकाराखालील कागदपत्रे नाचवत आहेत. त्यांना ती नाचवूं दे. आपण जिल्हावासियांशी प्रामाणिक आहोत. हे सर्व करत असताना यामागे कोणताही राजकारणाचा उद्देश नाही. ज्यांना राजकारण करायचं त्यांनी ते कराव. गेल्या दोन महिन्यात जिल्हावासीयांना कोण मदत करत आहे? कोण उपयोगी पडत आहे? हे जिल्हावासीयांनी स्वतः अनुभवलेले आहे. त्यामुळे जिल्हावासीय याचे उत्तर निवडणुकांमधून देतील, असे ते म्हणाले. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लॅबबाबत खुशाल राजकारण करा - उदय सामंत ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यासाठी मंजूर झालेली कोरोना तपासणी लॅब सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयात येत्या पंधरा ते वीस दिवसांत सुरू होईल. यामध्ये कोणतेही राजकारण नसून लॅब व्हावी एवढेच आपले प्रामाणिक प्रयत्न आहेत. ज्यांना राजकारण करायचं त्यांनी ते खुशाल करावे असा सल्ला पालकमंत्री उदय सामंत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांना दिला.  पालकमंत्री सामंत यांनी रत्नागिरी येथून झूम ऍपच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना पालकमंत्री सामंत यांनी, रत्नागिरीमध्ये कोरोना तपासणी लॅब मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गमधीलही कोरोना तपासणी लॅबला मंजुरी दिली आहे. आपल्या जिल्ह्यातुन पूर्ण कागदपत्रांसह पाठविलेला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी केवळ चार दिवसात मंजूर केला आहे. या मंजुरीसाठी खासदार विनायक राऊत यांनी चांगला पाठपुरावा केला. ते मुंबईत असल्याने त्यांनी सिंधुदुर्गात लॅब व्हावी यासाठी प्रयत्न केले. त्यांना आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनीही चांगले सहकार्य केले असे सांगितले.  या लॅब संदर्भातील नियमावली उद्यापर्यंत जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त होईल. यासाठी 61 ते 65 लाख रुपयांपर्यंतचे कोटेशन प्राप्त झाले असून, हा सर्व निधी जिल्हा नियोजन समितीमधून देण्यात येणार आहे. तशी मान्यता ही घेतली आहे. या लॅबसाठी अजून निधी लागल्यास तोही जिल्हा नियोजन मधून देण्यात येईल. ही लॅब पंधरा ते वीस दिवसांमध्ये सुरू होईल असा विश्वासही सामंत यांनी व्यक्त केला.  खासगी ठिकाणी लॅब झाल्यास त्या लॅबमधून तपासणीसाठी पैसे मोजावे लागणार होते. त्यापेक्षा शासकीय लॅब होणे अधिक चांगले. असे सांगतानाच काहीजण माहितीच्या अधिकाराखालील कागदपत्रे नाचवत आहेत. त्यांना ती नाचवूं दे. आपण जिल्हावासियांशी प्रामाणिक आहोत. हे सर्व करत असताना यामागे कोणताही राजकारणाचा उद्देश नाही. ज्यांना राजकारण करायचं त्यांनी ते कराव. गेल्या दोन महिन्यात जिल्हावासीयांना कोण मदत करत आहे? कोण उपयोगी पडत आहे? हे जिल्हावासीयांनी स्वतः अनुभवलेले आहे. त्यामुळे जिल्हावासीय याचे उत्तर निवडणुकांमधून देतील, असे ते म्हणाले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3gGAJr5
Read More
सर्वात मोठी बातमी - कोरोना रुग्णांना उपचार देण्याबाबत झाला 'मोठा' निर्णय...

मुंबई - कोरोनाविरूद्ध संपूर्ण जग लढतयं. मात्र या आजारावर अद्याप कुठल्याही प्रकारचे औषध तयार झालेले नाही. त्यामुळे विषाणूवर मात करायची असल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं हा एकच पर्याय आहे. यासाठी आता सरकारने कोरोना रुग्णांवर होमिओपॅथी व आयुर्वेदिक औषधांद्वारे उपचार करण्यास परवानगी दिली आहे.  कोरोना रुग्णांवर पारंपारिक औषधाद्वारे उपचार व्हावेत, यासाठी सरकारला अनेक प्रस्ताव पाठवले गेले होते. या, प्रस्तावाला सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. कोरोना विषाणूने जगभरात प्रचंड थैमान घातले आहे. अनेक लोक या विषाणूच्या जाळ्यात ओढला जाऊ लागले आहेत. देशभरासह आता महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय. 

मोठी बातमी -  एक कोरोनाबाधित रिक्षाचालक, तशीच चालवली १० दिवस रिक्षा, आता नागरिकांची तंतरली.. कुठे घडलाय 'हा' प्रकार..

महाराष्ट्रात जवळपास साठ हजाराहून अधिक रुग्णसंख्या झाली आहे तर मुंबईत जवळपास 36 हजार करोनाचे रुग्ण आढळले आहेत. वाढते रुग्ण लक्षात घेऊन रुग्णालयात खाटा वाढवणे, अतिदक्षता विभागात खाटा तयार ठेवणे, तात्पुरती रुग्णालये उभारणे तसेच दीड लाख लोकांसाठी 15 जून पर्यंत क्वारंटाइन केंद्र उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. कोरोना रुग्णांसाठी सरकार उपाययोजना करत आहे. मात्र, असे असताना या आजारावर उपचार करण्यासाठी प्रभावी औषध तयार झालेले नाही. हे लक्षात घेऊन आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी डॉक्टरांनी व त्यांच्या विविध संघटनांनी कोरोना रुग्णांवर आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी औषधांचा वापर करू देण्याची मागणी सरकारकडे केली होती. 

आयुर्वेदिक व होमिओपॅथी औषधे हे मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते, असे आयुर्वेद तज्ज्ञांनी म्हटले होते. त्यावर सरकारने वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली. कोरोना रुग्णांना होमिओपॅथी, आयुर्वेदिक व युनानी औषधे देण्याबाबतचा निर्णय ही समिती घेणार होती. त्यानुसार आता या समितीने कोरोना रुग्णांवर होमिओपॅथी, आयुर्वेदिक औषधांचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे. 

मोठी बातमी - नुसते गुन्हे दाखल करू नका, मी स्वतः आलोय, अटक करा...

याबाबत माहिती देताना वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने म्हणाले की, “ याबाबतचा निर्णय सरकार दरबारी आहे. लवकरच यावर निर्णय सरकारकडून घेतला जाणार आहे. वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा सुरु आहे. आमच्या समितीने याबाबत संबंधित विद्याशाखेच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी सखोल चर्चा करून होमिओपॅथी, आयुर्वेदिक आणि युनानीची कोणती औषधे रुग्णांना द्यायची हे निश्चित केले आहे. या औषधांमुळे कोरोना प्रतिबंधास मदत होण्याची शक्यता आहे आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वापरावी असे समितीच्या अहवालात नमूद केले आहे. तसेच ताप, घसा खवखवणे अथवा अन्य लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधण्यास अहवालात स्पष्ट केले आहे. 

याबाबत होमिओपॅथी डॉ. विद्यासागर उमाळकर म्हणाले की, “एक चांगला निर्णय असून होमिओपॅथी औषधांचा कोरोना रुग्णांमधील प्रतिकारशक्ती वाढण्यास निश्चित मदत होईल. या औषधातील सुक्ष्मातीसुक्ष्म औषधी द्रव्ये मुळातून काम करतात. यातून कोरोना नसलेल्या रुग्णांमधीलही प्रतिकारशक्ती वाढून कोरोनाची लागण होण्याची शक्यता दूरावण्यास मदत होते."

“अर्सेनिक, कॅमकोर आणि सेपीया आदी औषधे वापरल्यास त्याची प्रतिकारशक्ती वाढण्यास निश्चित मदत होईल. होमिओपॅथीच्या या औषधांचा कोरोना रुग्णांना तसेच रुग्ण नसलेल्यांची प्रकृती चांगली ठेवण्यास निश्चित मदत होते”, असे कल्याण येथील डॉ. विद्याधर गांगण यांनी सांगितले. 

‘कल्याण होमिओपॅथी डॉक्टर फाऊंडेशन’च्या माध्यमातून आम्ही कोरोनाची काळजी घेण्यासाठी आतापर्यंत जेवढ्यांना औषधे दिली त्यांची तपशीलवार नोंद ठेवलेली आहे. कोरोना रुग्णांसाठी मदत करणाऱ्या जवळपास सहाशे कार्यकर्त्यांना आम्ही होमिओपॅथीची औषधे दिली असून यातील एकालाही कोरोना झालेला नाही. तसेच करोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांनाही औषधे दिली असून त्यांचीही प्रकृती चांगली असून या सार्या नोंदी तपशीलवार महापालिका व संबंधित यंत्रणेला आम्ही देत आहोत, असे डॉ. विद्याधर गांगण यांनी सांगितले.

government took big decision about giving ayurvedic and homeopathic medicines to covid19 patients

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सर्वात मोठी बातमी - कोरोना रुग्णांना उपचार देण्याबाबत झाला 'मोठा' निर्णय... मुंबई - कोरोनाविरूद्ध संपूर्ण जग लढतयं. मात्र या आजारावर अद्याप कुठल्याही प्रकारचे औषध तयार झालेले नाही. त्यामुळे विषाणूवर मात करायची असल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं हा एकच पर्याय आहे. यासाठी आता सरकारने कोरोना रुग्णांवर होमिओपॅथी व आयुर्वेदिक औषधांद्वारे उपचार करण्यास परवानगी दिली आहे.  कोरोना रुग्णांवर पारंपारिक औषधाद्वारे उपचार व्हावेत, यासाठी सरकारला अनेक प्रस्ताव पाठवले गेले होते. या, प्रस्तावाला सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. कोरोना विषाणूने जगभरात प्रचंड थैमान घातले आहे. अनेक लोक या विषाणूच्या जाळ्यात ओढला जाऊ लागले आहेत. देशभरासह आता महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय.  मोठी बातमी -  एक कोरोनाबाधित रिक्षाचालक, तशीच चालवली १० दिवस रिक्षा, आता नागरिकांची तंतरली.. कुठे घडलाय 'हा' प्रकार.. महाराष्ट्रात जवळपास साठ हजाराहून अधिक रुग्णसंख्या झाली आहे तर मुंबईत जवळपास 36 हजार करोनाचे रुग्ण आढळले आहेत. वाढते रुग्ण लक्षात घेऊन रुग्णालयात खाटा वाढवणे, अतिदक्षता विभागात खाटा तयार ठेवणे, तात्पुरती रुग्णालये उभारणे तसेच दीड लाख लोकांसाठी 15 जून पर्यंत क्वारंटाइन केंद्र उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. कोरोना रुग्णांसाठी सरकार उपाययोजना करत आहे. मात्र, असे असताना या आजारावर उपचार करण्यासाठी प्रभावी औषध तयार झालेले नाही. हे लक्षात घेऊन आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी डॉक्टरांनी व त्यांच्या विविध संघटनांनी कोरोना रुग्णांवर आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी औषधांचा वापर करू देण्याची मागणी सरकारकडे केली होती.  आयुर्वेदिक व होमिओपॅथी औषधे हे मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते, असे आयुर्वेद तज्ज्ञांनी म्हटले होते. त्यावर सरकारने वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली. कोरोना रुग्णांना होमिओपॅथी, आयुर्वेदिक व युनानी औषधे देण्याबाबतचा निर्णय ही समिती घेणार होती. त्यानुसार आता या समितीने कोरोना रुग्णांवर होमिओपॅथी, आयुर्वेदिक औषधांचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे.  मोठी बातमी - नुसते गुन्हे दाखल करू नका, मी स्वतः आलोय, अटक करा... याबाबत माहिती देताना वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने म्हणाले की, “ याबाबतचा निर्णय सरकार दरबारी आहे. लवकरच यावर निर्णय सरकारकडून घेतला जाणार आहे. वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा सुरु आहे. आमच्या समितीने याबाबत संबंधित विद्याशाखेच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी सखोल चर्चा करून होमिओपॅथी, आयुर्वेदिक आणि युनानीची कोणती औषधे रुग्णांना द्यायची हे निश्चित केले आहे. या औषधांमुळे कोरोना प्रतिबंधास मदत होण्याची शक्यता आहे आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वापरावी असे समितीच्या अहवालात नमूद केले आहे. तसेच ताप, घसा खवखवणे अथवा अन्य लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधण्यास अहवालात स्पष्ट केले आहे.  याबाबत होमिओपॅथी डॉ. विद्यासागर उमाळकर म्हणाले की, “एक चांगला निर्णय असून होमिओपॅथी औषधांचा कोरोना रुग्णांमधील प्रतिकारशक्ती वाढण्यास निश्चित मदत होईल. या औषधातील सुक्ष्मातीसुक्ष्म औषधी द्रव्ये मुळातून काम करतात. यातून कोरोना नसलेल्या रुग्णांमधीलही प्रतिकारशक्ती वाढून कोरोनाची लागण होण्याची शक्यता दूरावण्यास मदत होते." “अर्सेनिक, कॅमकोर आणि सेपीया आदी औषधे वापरल्यास त्याची प्रतिकारशक्ती वाढण्यास निश्चित मदत होईल. होमिओपॅथीच्या या औषधांचा कोरोना रुग्णांना तसेच रुग्ण नसलेल्यांची प्रकृती चांगली ठेवण्यास निश्चित मदत होते”, असे कल्याण येथील डॉ. विद्याधर गांगण यांनी सांगितले.  ‘कल्याण होमिओपॅथी डॉक्टर फाऊंडेशन’च्या माध्यमातून आम्ही कोरोनाची काळजी घेण्यासाठी आतापर्यंत जेवढ्यांना औषधे दिली त्यांची तपशीलवार नोंद ठेवलेली आहे. कोरोना रुग्णांसाठी मदत करणाऱ्या जवळपास सहाशे कार्यकर्त्यांना आम्ही होमिओपॅथीची औषधे दिली असून यातील एकालाही कोरोना झालेला नाही. तसेच करोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांनाही औषधे दिली असून त्यांचीही प्रकृती चांगली असून या सार्या नोंदी तपशीलवार महापालिका व संबंधित यंत्रणेला आम्ही देत आहोत, असे डॉ. विद्याधर गांगण यांनी सांगितले. government took big decision about giving ayurvedic and homeopathic medicines to covid19 patients News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36MPAfd
Read More
मासळी लुटल्याप्रकरणी 16 जणांवर गुन्हा

मालवण (सिंधुदुर्ग) कोलवा-गोवा येथील जुवाव मार्टीन फर्नांडिस यांच्या ट्रॉलरवरील मासळीची लूट केल्याप्रकरणी सर्जेकोट येथील नारायण आडकर यांच्या मालकीच्या ओंकार या ट्रॉलरवरील सुमारे 16 मच्छीमारांवर चोरीसह दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गोव्यातील हार्बर कोस्टल सेक्‍युरीटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातील ट्रॉलर, मासळी तसेच एलईडी बल्ब हे साहित्य जप्त केले आहे. सर्व संशयितांवर कारवाई करत सोडून दिले आहे. जप्त मासळीचा लिलाव करून रक्कम गोवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली. 

याबाबतची माहिती अशी ः गोवा ते सिंधुदुर्गच्या समुद्रात सुमारे 60 ते 65 नॉटिकल मैल अंतरावर मासेमारी करणाऱ्या कोलवा-गोवा येथील जुवाव फर्नांडिस यांच्या ट्रॉलरला सर्जेकोट येथील नारायण आडकर यांच्या ट्रॉलरने घेरल्याची घटना परवा मध्यरात्री घडली. यात फर्नांडिस यांचा ट्रॉलर घेरत ट्रॉलरवरील मासळी, तसेच अन्य साहित्य असा एकूण 9 लाख रुपये किमतीचे साहित्य चोरल्याची घटना घडली. याप्रकरणाची तक्रार फर्नांडिस यांनी गोवा कोस्टलच्या पोलिसांसह, सिंधुदुर्गच्या पोलिसांकडे केली. गोव्यातील फर्नांडिस यांच्या ट्रॉलरवरील मासळीची लूट केल्याप्रकरणी गोव्यातील हार्बर कोस्टल सेक्‍युरिटी पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला.

याबाबतची माहिती सिंधुदुर्ग पोलिसांना दिल्यानंतर काल (ता.29) मालवण पोलिसांच्या गस्ती नौकेने आडकर यांचा मालकीचा ओंकार ट्रॉलर क्रमांक (आयएनडी-एम. एच.- एम. एम.- 3348) हा ट्रॉलर समुद्रात पकडून येथील बंदरात आणला. या ट्रॉलरवर मोठ्या प्रमाणात मासळी होती. या ट्रॉलरवर कारवाई करण्याबाबत मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता; मात्र मत्स्यव्यवसाय विभागाकडून रात्री उशिरापर्यंत कोणतीही कारवाई झाली नव्हती. 

ट्रॉलरवरील मासळीची लूट केल्याप्रकरणी किशोर सुभाष कांदळगावकर (वय 42), पुंडलिक कमलाकर शेलकर (वय 37 दोघे रा. कोळंब खालचीवाडा), नीलेश रमेश आडकर (वय 28), राहुल दिलीप आडकर (वय19) मयूर हरी खवणेकर (वय 23 तिघे रा. सर्जेकोट पिरावाडी), नारायण ऊर्फ भगवान सहदेव आडकर (वय 49), निहाल राजाराम आडकर (वय 22), तेजस शंकर फोंडबा (वय 23), रजनीकांत संभाजी पाडकर (वय 32), केदार प्रकाश कुडाळकर (वय 25), गोविंद मारुती सावजी (वय-22), हर्षल रवींद्र पराडकर (वय 30 रा. सर्जेकोट मिर्याबांद), जगदीश खंडोबा कांदळगावकर (वय 34), जगन्नाथ अंकुश सावजी (वय-31 सगळे रा. सर्जेकोट मिर्याबांदा), रजनीकांत रामकृष्ण देऊलकर (वय-31 रा. सर्जेकोट), हनुमंत भालचंद्र कवटकर (वय-30 रा. सर्जेकोट जेटी) या सोळा जणांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या सर्व संशयितांना सोडून देण्यात आले आहे. लॉकडाउननंतर पुढील तपासावेळी सर्व संशयितांना बोलावून घेत चौकशी केली जाणार असल्याचे हार्बर कोस्टल सेक्‍युरिटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिरोडकर यांनी स्पष्ट केले. 

मासळीचा लिलाव 
या गुन्ह्याच्या तपासासाठी आज गोव्यातील हार्बर कोस्टल सेक्‍युरीटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर, पोलिस उपनिरीक्षक ऑल्विटो फर्नांडिस, केदार भवर, जयेश तारी यांचे पथक मालवणात दाखल झाले. गुन्ह्यातील ट्रॉलर मालवण पोलिसांनी ताब्यात घेतला होता. मत्स्यव्यवसाय अधिकारी मुरारी भालेकर, सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण, पोलिस कर्मचारी माही महाडिक यांच्या उपस्थितीत बंदरावर या ट्रॉलरवरील लिलाव झाला. 2 लाख 33 हजार 60 रुपयांना मासळीचा लिलाव झाला. दुपारी उशिरा लिलावाची रक्कम पोलिसांच्या स्वाधीन केली. शिवाय जप्त ट्रॉलरही पोलिसांच्या ताब्यात दिला, अशी माहिती पोलिस निरीक्षक शिरोडकर यांनी दिली. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मासळी लुटल्याप्रकरणी 16 जणांवर गुन्हा मालवण (सिंधुदुर्ग) कोलवा-गोवा येथील जुवाव मार्टीन फर्नांडिस यांच्या ट्रॉलरवरील मासळीची लूट केल्याप्रकरणी सर्जेकोट येथील नारायण आडकर यांच्या मालकीच्या ओंकार या ट्रॉलरवरील सुमारे 16 मच्छीमारांवर चोरीसह दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गोव्यातील हार्बर कोस्टल सेक्‍युरीटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातील ट्रॉलर, मासळी तसेच एलईडी बल्ब हे साहित्य जप्त केले आहे. सर्व संशयितांवर कारवाई करत सोडून दिले आहे. जप्त मासळीचा लिलाव करून रक्कम गोवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली.  याबाबतची माहिती अशी ः गोवा ते सिंधुदुर्गच्या समुद्रात सुमारे 60 ते 65 नॉटिकल मैल अंतरावर मासेमारी करणाऱ्या कोलवा-गोवा येथील जुवाव फर्नांडिस यांच्या ट्रॉलरला सर्जेकोट येथील नारायण आडकर यांच्या ट्रॉलरने घेरल्याची घटना परवा मध्यरात्री घडली. यात फर्नांडिस यांचा ट्रॉलर घेरत ट्रॉलरवरील मासळी, तसेच अन्य साहित्य असा एकूण 9 लाख रुपये किमतीचे साहित्य चोरल्याची घटना घडली. याप्रकरणाची तक्रार फर्नांडिस यांनी गोवा कोस्टलच्या पोलिसांसह, सिंधुदुर्गच्या पोलिसांकडे केली. गोव्यातील फर्नांडिस यांच्या ट्रॉलरवरील मासळीची लूट केल्याप्रकरणी गोव्यातील हार्बर कोस्टल सेक्‍युरिटी पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला. याबाबतची माहिती सिंधुदुर्ग पोलिसांना दिल्यानंतर काल (ता.29) मालवण पोलिसांच्या गस्ती नौकेने आडकर यांचा मालकीचा ओंकार ट्रॉलर क्रमांक (आयएनडी-एम. एच.- एम. एम.- 3348) हा ट्रॉलर समुद्रात पकडून येथील बंदरात आणला. या ट्रॉलरवर मोठ्या प्रमाणात मासळी होती. या ट्रॉलरवर कारवाई करण्याबाबत मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता; मात्र मत्स्यव्यवसाय विभागाकडून रात्री उशिरापर्यंत कोणतीही कारवाई झाली नव्हती.  ट्रॉलरवरील मासळीची लूट केल्याप्रकरणी किशोर सुभाष कांदळगावकर (वय 42), पुंडलिक कमलाकर शेलकर (वय 37 दोघे रा. कोळंब खालचीवाडा), नीलेश रमेश आडकर (वय 28), राहुल दिलीप आडकर (वय19) मयूर हरी खवणेकर (वय 23 तिघे रा. सर्जेकोट पिरावाडी), नारायण ऊर्फ भगवान सहदेव आडकर (वय 49), निहाल राजाराम आडकर (वय 22), तेजस शंकर फोंडबा (वय 23), रजनीकांत संभाजी पाडकर (वय 32), केदार प्रकाश कुडाळकर (वय 25), गोविंद मारुती सावजी (वय-22), हर्षल रवींद्र पराडकर (वय 30 रा. सर्जेकोट मिर्याबांद), जगदीश खंडोबा कांदळगावकर (वय 34), जगन्नाथ अंकुश सावजी (वय-31 सगळे रा. सर्जेकोट मिर्याबांदा), रजनीकांत रामकृष्ण देऊलकर (वय-31 रा. सर्जेकोट), हनुमंत भालचंद्र कवटकर (वय-30 रा. सर्जेकोट जेटी) या सोळा जणांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या सर्व संशयितांना सोडून देण्यात आले आहे. लॉकडाउननंतर पुढील तपासावेळी सर्व संशयितांना बोलावून घेत चौकशी केली जाणार असल्याचे हार्बर कोस्टल सेक्‍युरिटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिरोडकर यांनी स्पष्ट केले.  मासळीचा लिलाव  या गुन्ह्याच्या तपासासाठी आज गोव्यातील हार्बर कोस्टल सेक्‍युरीटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर, पोलिस उपनिरीक्षक ऑल्विटो फर्नांडिस, केदार भवर, जयेश तारी यांचे पथक मालवणात दाखल झाले. गुन्ह्यातील ट्रॉलर मालवण पोलिसांनी ताब्यात घेतला होता. मत्स्यव्यवसाय अधिकारी मुरारी भालेकर, सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण, पोलिस कर्मचारी माही महाडिक यांच्या उपस्थितीत बंदरावर या ट्रॉलरवरील लिलाव झाला. 2 लाख 33 हजार 60 रुपयांना मासळीचा लिलाव झाला. दुपारी उशिरा लिलावाची रक्कम पोलिसांच्या स्वाधीन केली. शिवाय जप्त ट्रॉलरही पोलिसांच्या ताब्यात दिला, अशी माहिती पोलिस निरीक्षक शिरोडकर यांनी दिली.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dk6Xqa
Read More
कायदा झुगारून सोशल क्लबमध्ये केलेली गर्दी अंगलट

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - कोरोनामुळे सोशल क्‍लब चालविण्यास बंदी असताना वेतोरेतील सोशल क्‍लब चालू ठेवल्याने व त्याठिकाणी मोठी गर्दी झाल्याने ओरोस येथील स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने शुक्रवारी (ता. 29) सायंकाळी कारवाई करत 31 जणांना ताब्यात घेतले. त्याठिकाणी असलेल्या 10 दुचाकी, 1 मोटार ताब्यात घेण्यात आली. 

या सोशल क्‍लबचा अधिकृत परवाना आहे; पण जिल्हाधिकाऱ्यांचे कोविड-19 अंतर्गत बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई ओरोस जिल्हा मुख्यालयातील एलसीबीचे पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांच्यासह उपनिरीक्षक एस. एम. शेळके, हवालदार सुधीर सावंत, आशिष गंगावणे, पोलिस नाईक, अनिल धुरी, कॉन्स्टेबल सत्यजित पाटील, रवी इंगळे, ज्ञानेश्‍वर कांदळगावकर, संदीप नार्वेकर या पथकाने केली. 

कोरोनामुळे सोशल क्‍लब चालविण्यास बंदी असताना क्‍लब चालू ठेवल्याने कारवाई करण्यात आली आहे. राज्य कोविड-19 प्रतिबंधक अधिनियम कलम 11, संसर्गजन्य रोग पसरविण्याची कृती केल्याप्रकरणी आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी येथील पोलिस स्थानकमध्ये स्वरुप सोशल क्‍लब व क्रीडामंडळ वेतोरे यामध्ये गर्दी करून खेळात सहभागी झाल्याच्या प्रकारावरून गुन्हे दाखल करण्यात आले. 

रुपेश सावंत (वेतोरे), विश्‍वास परुळेकर (वेंगुर्ला), प्रमोद गावडे (कोचरा), प्रवीण कोचरेकर (चेंदवण), विठ्ठल पारकर (हुमरमळा), विलास म्हापणकर (पिंगुळी), सुनील भोगटे (कुडाळ), संभाजी गावडे (माड्याचीवाडी), गंगाराम पालकर (वेतोरे), अरुण राऊळ (माड्याची वाडी), दीपक भोगटे (पावशी), प्रशांत नाईक (होडावडे), सिद्धेश मुंगारे (सांगिर्डेवाडी-कुडाळ), मोहन जाधव (होडावडे), किशोर धुरी (आडेली), प्रभाकर राठोड (कुडाळ), बाळू पवार (पिंगुळी), राजू राठोड (कुडाळ), प्रशांत पाताडे (वालावल), मेघःश्‍याम राऊळ (तेंडोली), उमेश कानडे (हुमरमळा), मंदार वालावलकर (हुमरमळा), रविद्र धावडे (वेंगुर्ला), संजय नाईक (मठ), विलास वाळवे (गोवेरी), सचिन गोवेकर (केळुस), सुरेश पवार (कुडाळ), विजय गिरकर (वेंगुर्ला), गजानन शिरसाट (कुडाळ), किरण पाटील (वेंगुर्ला), संदिप चिचकर (वेतोरे) यांचा यात समावेश आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार सचिन सावंत करीत आहेत.   
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कायदा झुगारून सोशल क्लबमध्ये केलेली गर्दी अंगलट वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - कोरोनामुळे सोशल क्‍लब चालविण्यास बंदी असताना वेतोरेतील सोशल क्‍लब चालू ठेवल्याने व त्याठिकाणी मोठी गर्दी झाल्याने ओरोस येथील स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने शुक्रवारी (ता. 29) सायंकाळी कारवाई करत 31 जणांना ताब्यात घेतले. त्याठिकाणी असलेल्या 10 दुचाकी, 1 मोटार ताब्यात घेण्यात आली.  या सोशल क्‍लबचा अधिकृत परवाना आहे; पण जिल्हाधिकाऱ्यांचे कोविड-19 अंतर्गत बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई ओरोस जिल्हा मुख्यालयातील एलसीबीचे पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांच्यासह उपनिरीक्षक एस. एम. शेळके, हवालदार सुधीर सावंत, आशिष गंगावणे, पोलिस नाईक, अनिल धुरी, कॉन्स्टेबल सत्यजित पाटील, रवी इंगळे, ज्ञानेश्‍वर कांदळगावकर, संदीप नार्वेकर या पथकाने केली.  कोरोनामुळे सोशल क्‍लब चालविण्यास बंदी असताना क्‍लब चालू ठेवल्याने कारवाई करण्यात आली आहे. राज्य कोविड-19 प्रतिबंधक अधिनियम कलम 11, संसर्गजन्य रोग पसरविण्याची कृती केल्याप्रकरणी आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी येथील पोलिस स्थानकमध्ये स्वरुप सोशल क्‍लब व क्रीडामंडळ वेतोरे यामध्ये गर्दी करून खेळात सहभागी झाल्याच्या प्रकारावरून गुन्हे दाखल करण्यात आले.  रुपेश सावंत (वेतोरे), विश्‍वास परुळेकर (वेंगुर्ला), प्रमोद गावडे (कोचरा), प्रवीण कोचरेकर (चेंदवण), विठ्ठल पारकर (हुमरमळा), विलास म्हापणकर (पिंगुळी), सुनील भोगटे (कुडाळ), संभाजी गावडे (माड्याचीवाडी), गंगाराम पालकर (वेतोरे), अरुण राऊळ (माड्याची वाडी), दीपक भोगटे (पावशी), प्रशांत नाईक (होडावडे), सिद्धेश मुंगारे (सांगिर्डेवाडी-कुडाळ), मोहन जाधव (होडावडे), किशोर धुरी (आडेली), प्रभाकर राठोड (कुडाळ), बाळू पवार (पिंगुळी), राजू राठोड (कुडाळ), प्रशांत पाताडे (वालावल), मेघःश्‍याम राऊळ (तेंडोली), उमेश कानडे (हुमरमळा), मंदार वालावलकर (हुमरमळा), रविद्र धावडे (वेंगुर्ला), संजय नाईक (मठ), विलास वाळवे (गोवेरी), सचिन गोवेकर (केळुस), सुरेश पवार (कुडाळ), विजय गिरकर (वेंगुर्ला), गजानन शिरसाट (कुडाळ), किरण पाटील (वेंगुर्ला), संदिप चिचकर (वेतोरे) यांचा यात समावेश आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार सचिन सावंत करीत आहेत.      News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2zBYTTe
Read More
राज्यात आजपर्यंत २८,०८१ रुग्ण बरे झाले, तर एवढे अजून ॲक्‍टिव्ह रुग्ण; वाचा सविस्तर

मुंबई - आज राज्यात २९४० नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,१६८ झाली आहे; तर आज दिवसभरात ९९ मृत्यूंची नोंद झाली असून त्यातील ४० मृत्यू हे दोन दिवसांपूर्वीचे आहेत. आज १,०८४ रुग्ण बरे झाले असून, राज्यात आजपर्यंत एकूण २८,०८१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात ३४,८८१ ॲक्‍टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात ९९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ठाणे ८१, मुंबई -५४, वसई विरार -७, पनवेल ७, ठाणे - ६, रायगड- ३ , नवी मुंबई -२, कल्याण-डोंबवली २, नाशिक ३ , जळगाव ३, पुणे मनपा १२, पुणे ६, सोलापूर ६, नागपूर १, नागपूर १, इतर राज्यांतील २ मृत्यू असून राजस्थान येथील एक मृत्यू पनवेलमध्ये, तर बिहार येथील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे.

आता कैद्यांचा मुक्काम तुरुंगात नव्हे; तर...

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राज्यात आजपर्यंत २८,०८१ रुग्ण बरे झाले, तर एवढे अजून ॲक्‍टिव्ह रुग्ण; वाचा सविस्तर मुंबई - आज राज्यात २९४० नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,१६८ झाली आहे; तर आज दिवसभरात ९९ मृत्यूंची नोंद झाली असून त्यातील ४० मृत्यू हे दोन दिवसांपूर्वीचे आहेत. आज १,०८४ रुग्ण बरे झाले असून, राज्यात आजपर्यंत एकूण २८,०८१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात ३४,८८१ ॲक्‍टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यात ९९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ठाणे ८१, मुंबई -५४, वसई विरार -७, पनवेल ७, ठाणे - ६, रायगड- ३ , नवी मुंबई -२, कल्याण-डोंबवली २, नाशिक ३ , जळगाव ३, पुणे मनपा १२, पुणे ६, सोलापूर ६, नागपूर १, नागपूर १, इतर राज्यांतील २ मृत्यू असून राजस्थान येथील एक मृत्यू पनवेलमध्ये, तर बिहार येथील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे. आता कैद्यांचा मुक्काम तुरुंगात नव्हे; तर... News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dlDnR5
Read More
धक्कादायक! पुण्यात १४ दिवसांत एवढ्या जणांनी संपविले जीवन

पुणे - शहर आणि परिसरात चौदा दिवसांमध्ये २८ जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यातील ११ जण कमावत्या म्हणजे ३१ ते ५० वर्षे वयातील असल्याची माहिती पुढे आली आहे. ससून रुग्णालयात १५ ते २९ मे या काळात आत्महत्या केलेल्यांचे मृतदेह विच्छेदनासाठी आल्यावर त्याच्या विश्‍लेषणातून हे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपर्यंत सरासरी दर दिवशी एक गळफास घेऊन आत्महत्या केलेले शव विच्छेदनासाठी येत असे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा 

वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या करणाऱ्यांमध्ये ७९ टक्के (२२) पुरुष आहेत. ११ ते २० आणि ३१ ते ५० वर्षे वयोगटातील प्रत्येकी दोन जणींनी गळफास घेतला. त्यामुळे महिलांचे प्रमाण २१ टक्के (६) इतके आहे. वयाची साठी ओलांडलेल्या सहा जणांनी आत्महत्या केली. त्यात सर्व पुरुष आहेत.

कोथरूडमध्ये जास्त प्रमाण
ससून रुग्णालयात शवविच्छेदन झालेल्या २८ पैकी पाच मृतदेह जिल्ह्यातील होते. त्यात लोणीकंद येथील तीन, लोणी काळभोर आणि ग्रामीण भागातील प्रत्येकी एक मृतदेह होता. उर्वरित २३ आत्महत्यांच्या घटना शहरातील असून त्यात सिंहगड रस्त्यावर चार आणि कोथरूड, मुंढवा भागातील तिघांचा समावेश आहे.

पुणेकरांनो लॉकाडाउन वाढला; पण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन शक्य आहे!

आत्महत्येचे कारण

प्रेमभंग

वेगवेगळ्या परिस्थितीमुळे आलेले नैराश्‍य 

भविष्यात भेडसवणाऱ्या संकटाची भीती 

घरातील भांडणे

News Story Feeds https://ift.tt/3ckf4Sm

धक्कादायक! पुण्यात १४ दिवसांत एवढ्या जणांनी संपविले जीवन पुणे - शहर आणि परिसरात चौदा दिवसांमध्ये २८ जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यातील ११ जण कमावत्या म्हणजे ३१ ते ५० वर्षे वयातील असल्याची माहिती पुढे आली आहे. ससून रुग्णालयात १५ ते २९ मे या काळात आत्महत्या केलेल्यांचे मृतदेह विच्छेदनासाठी आल्यावर त्याच्या विश्‍लेषणातून हे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपर्यंत सरासरी दर दिवशी एक गळफास घेऊन आत्महत्या केलेले शव विच्छेदनासाठी येत असे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा  वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या करणाऱ्यांमध्ये ७९ टक्के (२२) पुरुष आहेत. ११ ते २० आणि ३१ ते ५० वर्षे वयोगटातील प्रत्येकी दोन जणींनी गळफास घेतला. त्यामुळे महिलांचे प्रमाण २१ टक्के (६) इतके आहे. वयाची साठी ओलांडलेल्या सहा जणांनी आत्महत्या केली. त्यात सर्व पुरुष आहेत. कोथरूडमध्ये जास्त प्रमाण ससून रुग्णालयात शवविच्छेदन झालेल्या २८ पैकी पाच मृतदेह जिल्ह्यातील होते. त्यात लोणीकंद येथील तीन, लोणी काळभोर आणि ग्रामीण भागातील प्रत्येकी एक मृतदेह होता. उर्वरित २३ आत्महत्यांच्या घटना शहरातील असून त्यात सिंहगड रस्त्यावर चार आणि कोथरूड, मुंढवा भागातील तिघांचा समावेश आहे. पुणेकरांनो लॉकाडाउन वाढला; पण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन शक्य आहे! आत्महत्येचे कारण प्रेमभंग वेगवेगळ्या परिस्थितीमुळे आलेले नैराश्‍य  भविष्यात भेडसवणाऱ्या संकटाची भीती  घरातील भांडणे News Story Feeds https://ift.tt/3ckf4Sm

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XO2s0z
Read More
बॉलिवूडच्या या पिता-पुत्रीचे आहे अहल्याबाई होळकरांशी नाते, जाणून घ्या...

औरंगाबाद - पुण्यश्लोक, कर्मयोगिनी लोकमाता अहल्याबाई होळकर यांची आज (ता. ३१ मे) जयंती. अहल्याबाईंनी या होळकरांची बाणेदार सून, स्वाभिमानी राज्यकर्ती म्हणून त्या जगल्या. अशा या संतत्व वृत्तीच्या लोकमातेने मालव्याच्या प्रांतावर तब्बल २८ वर्षे लोककल्याणकारी राज्य केले. एक कुशल प्रशासक म्हणून त्यांची ख्याती आहे. आज होळकर घराण्याचे वंशज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. पण, बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध पती-पुत्रीही होळकर घराण्याशी संबंधित आहेत. त्यांची खास माहिती eSakal.com च्या वाचकांसाठी.

 
कोण आहेत ते पिता-पुत्री?

विजयेंद्र घाटगे आणि सागरिका घाटगे हे त्या पिता-पुत्रीचे नाव आहे. घाटगे कुटुंब राजघराणे आहे. सागरिकाची आजी म्हणजे विजयेंद्र यांच्या आजी सीताराजे घाटगे या इंदूरचे महाराजा तुकोजीराव होळकर यांच्या तृतीय कन्या होत. तुकोजीराव होळकर हे पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांचे थेट वंशज आहेत. दोन वर्षांपूर्वी सागरिकाने क्रिकेटपट्टू झहीर खानसोबत लग्न केले.

सतत ऑनलाइन असाल तर सावधान! जडताहेत हे आजार...

 
कोण आहेत विजयेंद्र घाटगे? 

सागरिकाचे वडील विजयेंद्र घाटगे यांनीही अनेक हिंदी चित्रपटांत भूमिका साकारलेल्या आहेत. ‘प्रेमरोग’, ‘देवदास’, ‘चितचोर’ यांसारख्या चित्रपटांत ते झळकले होते. वर्ष १९८६ मध्ये दूरदर्शनवर आलेल्या ‘बुनियाद’ मालिकेत त्यांना लाला ब्रिजभानपासून लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले. विजयेंद्र यांनी वाणिज्य शाखेतून पदवी घेतली. नंतर एफआयटीआयमधून अभिनयाचे धडेही घेतले. वर्ष १९७६ मध्ये ‘चितचोर’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये एंट्री केली. हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. 
 

होळकर घराण्याचा इतिहास

मराठी विश्वकोशात असलेल्या माहितीनुसार, ‘होळकर घराण्याने उत्तरेकडे राज्य विस्तार करून मध्य प्रदेशात स्वतंत्र संस्थान स्थापन केले. त्यांचा मूळ पुरुष खंडुजी हे धनगर जातीचे असून, ते शेतकरी होते. त्यांच्याकडे चौगुला वतन होते. प्रथम हे घराणे वडगाव (ता. खेड) येथे राहत होते.

नीरा नदीच्या काठी होळ मुरूम येथे मालिबा नावाचे एक मराठा धनगर होऊन गेले. त्यांच्या अकराव्या पिढीतील खंडुजी वा खंडोजी यांचे पुत्र मल्हारराव (१६९३–१७६६) यांनाच होळकर घराणे नावारूपास आणण्याचे श्रेय द्यावे लागेल. १७२५ मध्ये पहिल्या बाजीरावांनी त्यांना पाचशे स्वारांचा मुख्य नेमून माळव्यातील चौथवसुलीचे अधिकार दिले व माळवा प्रांताचा सुभेदार नेमले (१७३०). मल्हाररावांनी राणोजी शिंदे व उदाजी पवार यांबरोबर मराठी साम्राज्याच्या रक्षणासाठी व वृद्धीसाठी १७६६ पर्यंत अपरंपार कष्ट केले. उत्कृष्ट युद्धनेतृत्व व उत्तम राज्यव्यवस्था ह्यांमुळे बाणेदार व निधड्या छातीचे मल्हारराव हे धामधुमीच्या काळात मराठ्यांचे ज्येष्ठ व श्रेष्ठ सुभेदार ठरले.’  

Admission अकरावी प्रवेशप्रक्रियेसाठी अॅप..

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

बॉलिवूडच्या या पिता-पुत्रीचे आहे अहल्याबाई होळकरांशी नाते, जाणून घ्या... औरंगाबाद - पुण्यश्लोक, कर्मयोगिनी लोकमाता अहल्याबाई होळकर यांची आज (ता. ३१ मे) जयंती. अहल्याबाईंनी या होळकरांची बाणेदार सून, स्वाभिमानी राज्यकर्ती म्हणून त्या जगल्या. अशा या संतत्व वृत्तीच्या लोकमातेने मालव्याच्या प्रांतावर तब्बल २८ वर्षे लोककल्याणकारी राज्य केले. एक कुशल प्रशासक म्हणून त्यांची ख्याती आहे. आज होळकर घराण्याचे वंशज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. पण, बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध पती-पुत्रीही होळकर घराण्याशी संबंधित आहेत. त्यांची खास माहिती eSakal.com च्या वाचकांसाठी.   कोण आहेत ते पिता-पुत्री? विजयेंद्र घाटगे आणि सागरिका घाटगे हे त्या पिता-पुत्रीचे नाव आहे. घाटगे कुटुंब राजघराणे आहे. सागरिकाची आजी म्हणजे विजयेंद्र यांच्या आजी सीताराजे घाटगे या इंदूरचे महाराजा तुकोजीराव होळकर यांच्या तृतीय कन्या होत. तुकोजीराव होळकर हे पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांचे थेट वंशज आहेत. दोन वर्षांपूर्वी सागरिकाने क्रिकेटपट्टू झहीर खानसोबत लग्न केले. सतत ऑनलाइन असाल तर सावधान! जडताहेत हे आजार...   कोण आहेत विजयेंद्र घाटगे?  सागरिकाचे वडील विजयेंद्र घाटगे यांनीही अनेक हिंदी चित्रपटांत भूमिका साकारलेल्या आहेत. ‘प्रेमरोग’, ‘देवदास’, ‘चितचोर’ यांसारख्या चित्रपटांत ते झळकले होते. वर्ष १९८६ मध्ये दूरदर्शनवर आलेल्या ‘बुनियाद’ मालिकेत त्यांना लाला ब्रिजभानपासून लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले. विजयेंद्र यांनी वाणिज्य शाखेतून पदवी घेतली. नंतर एफआयटीआयमधून अभिनयाचे धडेही घेतले. वर्ष १९७६ मध्ये ‘चितचोर’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये एंट्री केली. हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.    होळकर घराण्याचा इतिहास मराठी विश्वकोशात असलेल्या माहितीनुसार, ‘होळकर घराण्याने उत्तरेकडे राज्य विस्तार करून मध्य प्रदेशात स्वतंत्र संस्थान स्थापन केले. त्यांचा मूळ पुरुष खंडुजी हे धनगर जातीचे असून, ते शेतकरी होते. त्यांच्याकडे चौगुला वतन होते. प्रथम हे घराणे वडगाव (ता. खेड) येथे राहत होते. नीरा नदीच्या काठी होळ मुरूम येथे मालिबा नावाचे एक मराठा धनगर होऊन गेले. त्यांच्या अकराव्या पिढीतील खंडुजी वा खंडोजी यांचे पुत्र मल्हारराव (१६९३–१७६६) यांनाच होळकर घराणे नावारूपास आणण्याचे श्रेय द्यावे लागेल. १७२५ मध्ये पहिल्या बाजीरावांनी त्यांना पाचशे स्वारांचा मुख्य नेमून माळव्यातील चौथवसुलीचे अधिकार दिले व माळवा प्रांताचा सुभेदार नेमले (१७३०). मल्हाररावांनी राणोजी शिंदे व उदाजी पवार यांबरोबर मराठी साम्राज्याच्या रक्षणासाठी व वृद्धीसाठी १७६६ पर्यंत अपरंपार कष्ट केले. उत्कृष्ट युद्धनेतृत्व व उत्तम राज्यव्यवस्था ह्यांमुळे बाणेदार व निधड्या छातीचे मल्हारराव हे धामधुमीच्या काळात मराठ्यांचे ज्येष्ठ व श्रेष्ठ सुभेदार ठरले.’   Admission अकरावी प्रवेशप्रक्रियेसाठी अॅप.. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XjC13L
Read More
रात्री मुलांना घेऊन बाहेर गेला पती अन् पत्नीचा सुटला संयम...वाचा ही ह्रदयद्रवावक कहाणी...

नागपूर : सहा वर्षांच्या सुखी संसारानंतर संशयाच्या भूताने पछाडले अन् एका सुखी संसाराला जणू ग्रहणच लागले. सततच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये ताणतणाव वाढत गेला. अखेर प्रेमविवाहाचा करूण अंत झाला. ही घटना बेलतरोडीत परिसरात उघडकीस आली.  

आनंद चौरे आणि सारिका चौरे (वय 28, रा. महाकालीनगर झोपडपट्‌टी) हे दोघेही लग्नापूर्वी एकमेकांचे शेजारी होते. त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनीही आईवडिलांना सांगून गेल्या सहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. त्यांच्या सुखी संसारावर दोन फुले उमलली. मोठा मुलगा पाच वर्षांचा तर लहान तीन वर्षाचा आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून दोघांत खटके उडायला लागले होती. दोघांच्या नात्यामध्ये संशयाने प्रवेश केला. पती आनंद हा बांधकामावर मजूर म्हणून कामाला होता तर सारिका ही गृहिणी होती. दोन्ही मुलांचा सांभाळ करणे तसेच वेळ पडल्यास पतीसह कामालाही जात होती. गेल्या महिन्याभरापासून घरात धुसफूस सुरू होती. मात्र, त्याबाबत आईवडीलांना माहिती होऊ दिली नव्हती. सर्व काही आलबेल असल्याचे त्यांच्याकडून दर्शविण्यात येत होते.

अवश्य वाचा - ब्रेकिंग...मुंबईवरून आलेल्या कोरोनाग्रस्ताचा यवतमाळात मृत्यू

प्रेमविवाहाचा करूण अंत

23 मे रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास पती-पत्नीत पुन्हा वाद झाला. दोघांनीही एकमेकांवर आगपाखड केली. रात्री दहा वाजता आनंदने दोन्ही मुलांसह जेवण केले आणि फेरफटका मारण्यासाठी मुलांना घेऊन निघून गेला. अर्ध्या तासात तो परतला असता सारिका ही ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्याने लगेच धाव घेत ब्लेडने ओढणी कापली. बेशुद्धावस्थेत असलेल्या सारिकाला तातडीने मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पाच दिवस उपचार घेतल्यानंतर शुक्रवारी सारिकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. गेल्या पाच दिवस सारिका बेशुद्ध असल्यामुळे पोलिसांना तिचे मृत्यूपूर्व बयाण (डीडी) घेता आले नाही. त्यामुळे पती-पत्नीत नेमका काय वाद होता, हे निश्‍चित कळू शकले नाही, अशी माहिती बेलतरोडी पोलिसांनी दिली.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

रात्री मुलांना घेऊन बाहेर गेला पती अन् पत्नीचा सुटला संयम...वाचा ही ह्रदयद्रवावक कहाणी... नागपूर : सहा वर्षांच्या सुखी संसारानंतर संशयाच्या भूताने पछाडले अन् एका सुखी संसाराला जणू ग्रहणच लागले. सततच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये ताणतणाव वाढत गेला. अखेर प्रेमविवाहाचा करूण अंत झाला. ही घटना बेलतरोडीत परिसरात उघडकीस आली.   आनंद चौरे आणि सारिका चौरे (वय 28, रा. महाकालीनगर झोपडपट्‌टी) हे दोघेही लग्नापूर्वी एकमेकांचे शेजारी होते. त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनीही आईवडिलांना सांगून गेल्या सहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. त्यांच्या सुखी संसारावर दोन फुले उमलली. मोठा मुलगा पाच वर्षांचा तर लहान तीन वर्षाचा आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून दोघांत खटके उडायला लागले होती. दोघांच्या नात्यामध्ये संशयाने प्रवेश केला. पती आनंद हा बांधकामावर मजूर म्हणून कामाला होता तर सारिका ही गृहिणी होती. दोन्ही मुलांचा सांभाळ करणे तसेच वेळ पडल्यास पतीसह कामालाही जात होती. गेल्या महिन्याभरापासून घरात धुसफूस सुरू होती. मात्र, त्याबाबत आईवडीलांना माहिती होऊ दिली नव्हती. सर्व काही आलबेल असल्याचे त्यांच्याकडून दर्शविण्यात येत होते. अवश्य वाचा - ब्रेकिंग...मुंबईवरून आलेल्या कोरोनाग्रस्ताचा यवतमाळात मृत्यू प्रेमविवाहाचा करूण अंत 23 मे रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास पती-पत्नीत पुन्हा वाद झाला. दोघांनीही एकमेकांवर आगपाखड केली. रात्री दहा वाजता आनंदने दोन्ही मुलांसह जेवण केले आणि फेरफटका मारण्यासाठी मुलांना घेऊन निघून गेला. अर्ध्या तासात तो परतला असता सारिका ही ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्याने लगेच धाव घेत ब्लेडने ओढणी कापली. बेशुद्धावस्थेत असलेल्या सारिकाला तातडीने मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पाच दिवस उपचार घेतल्यानंतर शुक्रवारी सारिकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. गेल्या पाच दिवस सारिका बेशुद्ध असल्यामुळे पोलिसांना तिचे मृत्यूपूर्व बयाण (डीडी) घेता आले नाही. त्यामुळे पती-पत्नीत नेमका काय वाद होता, हे निश्‍चित कळू शकले नाही, अशी माहिती बेलतरोडी पोलिसांनी दिली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XfSmGw
Read More