Horoscope Today, 31 May: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/2Xg2H5t Latest news updates May 30, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
तूफान और ओलावृष्टि से यूपी के कन्नौज में भारी तबाही, 6 लोगों की मौत, 4 घायल https://ift.tt/2XfKHbq Latest news updates May 30, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
JK: सोपोर से LeT के 3 आतंकी गिरफ्तार, हथियार-गोला बारूद भी बरामद https://ift.tt/2XgBFe3 Latest news updates May 30, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
युद्ध जिंकायचंय, तर...! राज्यात किंवा पुण्यात १ जूननंतर काहीतरी मोठा चमत्कार होईल, असे समजण्याचे मुळीच कारण नाही. ‘लॉकडाउन पाच’ की आणखी सहा, सात हे आकडे मोजण्यातही आता अर्थ नाही. टप्प्याटप्प्याने खुलेपण येईल, त्याचा अधिक सावधानतेने जीवन पूर्ववत करण्यासाठी कसा वापर करता येईल, हेच आता आपल्या हातात आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा पुण्यात म्हटलं तर परिस्थिती सुधारतेय, म्हटलं तर नाही; पण परिस्थिती हाताबाहेर गेली नाही हे नक्की. आता या परिस्थितीला चांगल्या अवस्थेत नेण्यासाठी पुन्हा एकदा सामुदायिक आरोग्यभान आणि एकमेकांना व्यवसाय, उद्योग, कौटुंबिक गरजांमध्ये मदतीचा हात देण्याची आवश्यकता निश्चित असेल. पुणेकरांनो लॉकाडाउन वाढला; पण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन शक्य आहे! पुण्यात ३० जूनपर्यंत २२ हजार ९४० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ९ हजार ७४३ असेल आणि त्यासाठी सुमारे २१६ आयसीयू बेड आणि १०७ व्हेंटिलेटर कमी पडतील, अशी शक्यताही वर्तविली आहे. हे आकडे यासाठी की पुढच्या काळात आपली आरोग्य सज्जता वाढवावी लागेल. पुण्यात एका बाजूला जनता वसाहतीचे उदाहरण आहे. येथे एकही रुग्ण नसताना तेथील संख्या झपाट्याने वाढली. दुसरीकडे पाटील इस्टेट झोपडपट्टीत तब्बल १७२ रुग्ण असतानाही तेथे योग्य ती काळजी घेतली गेल्याने गेल्या आठवडाभरात एकही नवा रुग्ण आढळला नाही. झोपडपट्टीसारख्या दाट वस्तीतही कोरोनाला रोखता येते, याची उदाहरणे बरीच आहेत. या सर्वांचा गाभा सार्वजनिक स्वच्छता हाच आहे. त्यामुळे लॉकडाउनचे काय व्हायचे ते होईल, नव्या सवयींना आणि प्रशासनाच्या पातळीवर नव्या योजनांच्या अंमलबजावणीला सुरुवात करावी लागेल. तरच कोरोनाचे युद्ध आपण जिंकू. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates May 30, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2MghE1a Read More Read more No comments:
तंबाखूविरोधी दिन विशेष : महाविद्यालयीन तरुणींही निकोटिनच्या जाळ्यात औरंगाबाद : तंबाखू आणि तंबाखूयुक्त पदार्थांच्या सेवनाच्या जाळ्यात अल्पवयातच तरुणाई ओढली जात आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे महाविद्यालयीन तरुणींचाही समावेश आहे. तंबाखूचे सेवन करण्यापेक्षा सिगारेट ओढण्याकडे तरुण आकृष्ट होत आहेत. यामुळे सिगारेटच्या व्यसनातूनच पुढे तंबाखूपेक्षा अधिक नशेच्या अमलाखाली तरुणाई जाण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ग्लोबल अॅडल्ट टोबॅकोच्या दुसऱ्या सर्वेक्षणानुसार देशातील २६ कोटी ७० लाख म्हणजे एकूण लोकसंख्येच्या २८.६ टक्के लोक येणकेन प्रकारे तंबाखूची तलफ भागवत आहेत. त्यापैकी २९.६ टक्के लोक तंबाखू किंवा तंबाखूयुक्त पदार्थ चघळतात किंवा खातात. १०.०७ टक्के लोक धूम्रपान करतात, तर काहीजण दोन्ही प्रकारची व्यसने करतात. देशाच्या एकूण लोकसंख्येचा विचार केल्यास १९ टक्के पुरुष तर दोन टक्के महिला धूम्रपान करतात. तसेच २१.४ टक्के पुरुष व १२.८ टक्के महिला तंबाखू किंवा तंबाखूयुक्त पदार्थ खातात. शासकीय दंत महाविद्यालयातील डॉ. शिरीष खेडगीकर म्हणाले, की युवतीही नशेच्या आहारी जात आहेत. विशेषत: आय. टी. कंपन्यात काम करणाऱ्या युवतींचे प्रमाण अधिक आहे. सतत ऑनलाइन असाल तर सावधान! जडताहेत हे आजार... औरंगाबादमध्येदेखील एका महाविद्यालयातील ज्या बाहेरच्या राज्यातून शिकण्यासाठी आलेल्या आहेत त्या मुली सिगारेट ओढतात. सार्वजनीक ठिकाणी धूम्रपानाला बंदी असल्याने हुक्का पिणाऱ्यांचेही प्रमाण बऱ्यापैकी आहे. याशिवाय ई-सिगारेट जिला ENDS (इलेक्ट्रॉनिक निकोटिन डिलिव्हरी सिस्टीम) म्हणतात मात्र या बॅटरीवर चालणाऱ्या सिस्टीममुळे व्यसन करणाऱ्यांचा मृत्यूच होऊ शकतो. देशात २०१८ मध्ये एकूण मृत्यूपैकी साडेनऊ टक्के मृत्यू धूम्रपान केल्याने झाले. या व्यसनामुळे आजारी झालेल्यांवर कराव्या लागणाऱ्या उपचारांसाठी त्यावर्षी अंदाजे १३,५१७ कोटी रुपये खर्च झाले. हा खर्च आपल्या देशाला सध्याच्या परिस्थितीत अजिबात परवडणारा नाही. त्यामुळे तंबाखू नियंत्रणविषयक ‘कोटपा’ कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. Admission अकरावी प्रवेशप्रक्रियेसाठी अॅप.. कमी वयातच व्यसनाधीन केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या कायदे सल्लागारांनी तंबाखू सेवन आणि धूम्रपान करण्यासाठी सध्या असलेली १८ वर्षे वयाची परवानगी रद्द करून ती २१ वर्षे करण्याची सरकारकडे शिफारस केली आहे. काही दुरुस्त्यांसह हा कायदा मंजुरीसाठी संसदेकडे पाठवला जाणार आहे. ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हेच्या पहिल्या आणि दुसऱ्या सर्वेक्षणानंतर तंबाखूच्या व्यसनाची चटक लागलेल्या युवकांच्या वयामध्ये सरासरी १८ वर्षे नऊ महिन्यांवरून १७ वर्षे नऊ महिन्यांपर्यंतची घसरण आढळून आल्याने सध्याची १८ वर्षांची तरतूद रद्द करून ती २१ वर्षे केली जाणार आहे. निकोटिनची नशा म्हणजे काय? डॉ. खेडगीकर म्हणाले, की तंबाखू तोंडात ठेवल्यावर किंवा ओढल्यावर तंबाखूतील निकोटिन व्यसन करणाऱ्याच्या रक्तप्रवाहात चटकन मिसळते. विडी, सिगारेट, हुक्का किंवा नस (तपकीर) ओढल्यावर लागलीच रक्तात निकोटिन मिसळते. अवघ्या पंधरा-वीस सेकंदांत शरीरात पसरते, मेंदूपर्यंत जाऊन नशा आल्याचा फील येतो; मात्र हे क्षणिक सुख असते. याचेच पुढे व्यसनात रूपांतर होते. तंबाखू सेवनाने तोंडाचा कॅन्सर होतो, रक्तातील पेशींचे स्वरूप बदलते; तसेच धूम्रपानामुळे पचनसंस्थाविषयक, हृदयविकार, फुप्फुसाचे विकार होतात. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates May 30, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3eAa6Ck Read More Read more No comments:
आठ दिवसांत प्रेम अन् पळून केले लग्न; तरीही पोलिसांनी लावला विवाह, मग... व्याहाड खुर्द (जि. चंद्रपूर) : लॉकडाउन सुरू असल्यामुळे दोन कुटुंबातील मुलगा आणि मुलगी आई-वडिलांकडे राहायला आहे. दोघांचेही घर शेजारीच. त्यामुळे दोघांची एकमेकांसोबत ओळख झाली. आठ दिवसांतच त्यांच्यात प्रेम झाले. दोघांनीही घरच्यांना लग्न लावून देण्याची मागणी केली. मात्र, विरोध झाल्याने पळून लग्न केले. पोलिसांनी त्यांना शोधून काढले अन् पुढील प्रकार घडला... चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुका. येथील कोंडखेल येथील विटाभट्टीत सिद्धार्थ रामटेके व गुरूदेव सहारे हे कामगार. दोघेही कामगार आपल्या कुटुंबासह तिथेच झोपडी बांधून राहतात. देशात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे रामटेके यांची मुलगी माया व सहारे यांचा मुलगा पवन आई-वडिलांकडे राहायला आले. दोघांच्याही झोपड्या शेजारीच. त्यामुळे माया आणि पवनची ओळखी झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आठ दिवसांतच प्रेम झाले आणि लग्न करण्याचे ठरवले. अधिक माहितीसाठी - आंबटशौकिनांच्या मागणीत प्रचंड वाढ... बंद ब्यूटी पार्लर, ढाब्यांमध्ये रंगतोय खेळ मायाने आई-वडिलांना पवनसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगून लग्न लावून देण्याची मागणी केली. मात्र, आई-वडिलांनी त्यांच्या नात्याला विरोध दर्शवला. परंतु, प्रेमात बुडालेली माया काहीही ऐकाला तयार नाही. त्यामुळे रामटेके यांनी मुलीला मावशीच्या घरी नेऊन सोडले. परंतु, दोघांमध्ये मोबाईलवरून संवाद सुरूच होता. अशातच त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्धार केला. दोघेही पळून गेले. वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार बेंबाळ पोलिस उपकेंद्रात दाखल केली. पोलिसांनी लागलीच शोध सुरू केला. तपासात पवन आणि माया गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बेंबाळ पोलिसांनी आरमोरी ठाणेदारांशी संपर्क केला. आरमोरी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. आम्ही वयस्क असून, लग्न केल्याची माहिती माया व पवन यांनी पोलिसांनी दिली. तरीही पोलिसांनी त्यांचे पुन्हा लग्न लावून दिले. हेही वाचा - तिसरे मंगलाष्टक सुरू झाल्यावर वधू म्हणाली, "तू मला पसंत नाहीस" दोघेही विलगीकरणात टाळेबंदीत दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून येणाऱ्यांचे संस्थात्मक विलगीकरण करा, असे सरकारचे निर्देश आहे. दोघेही चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात आले होते. त्यामुळे तिथे त्यांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले. सध्या ते दोघेही आरमोरी येथील विलगीकरण केंद्रात आहे. वैवाहिक जीवन लॉकडाउन टाळेबंदी आणि सीमाबंद असतानाही प्रेमीयुगुला पळून गेले. तिथे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दोघेही वयस्क असल्याने त्यांचा विवाह ठाणेदारांनी लावून दिला. मात्र, दुसऱ्या जिल्ह्यातून आल्याने त्यांचे तिथे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले. त्यामुळे सध्यातरी त्यांच्या वैवाहिक जीवनाचे लॉकडाउन झाले आहे. विशेष म्हणजे त्यांचे प्रेमसबंध जुळून केवळ आठ दिवस झाले होते. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates May 30, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3dk2d3Q Read More Read more No comments:
दिलासादायक! २४ तासांत झाले विक्रमी रूग्ण कोरोनामुक्त नवी दिल्ली - कोरोना महामारीविरूद्धच्या लढाईतील आजचा दिवस भारतासाठी नवा आशेचा किरण घेऊन आला. मागच्या २४ तासांत ११ हजारांहून जास्त विक्रमी रूग्ण कोरोनामुक्त झाले, त्याचप्रमाणे देशातील सक्रिय रूग्णांची संख्या या संपूर्ण काळात प्रथमच घटली. रूग्ण बरे होण्याचाही दर (रिकव्हरी रेट) आतापर्यंत सर्वाधिक ४७ टक्क्यांपेक्षा जास्त नोंदवला गेला. आणखी वाचा - देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा देशात गेल्या २४ तासांत आणखी २६४ लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांची संख्या पाच हजारापर्यंत पोहोचली आहे. मागच्या २४ तासांत बरे झालेल्यांची संख्या ११,२६४ होती तर नवे ७,९६४ रुग्ण आढळले. नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारांची संख्या जास्त असण्याची ही पहिलीच वेळ आहे. लॉकडाउनमधून सुटका नाहीच; देशभरात मुदत वाढवली सहा राज्यांत निम्मे रुग्ण झाले बरे देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्यात कोरोनाचा प्रभाव सर्वाधिक आहे. त्यातील तमिळनाडू, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात जेवढे रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत, त्यापेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सहा राज्यांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. News Story Feeds https://ift.tt/2MaOxMy Latest news updates May 30, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/36KSalJ Read More Read more No comments:
राज्यातून आतापर्यंत किती लोक परतले; वाचा सविस्तर मुंबई - राज्यातून आतापर्यंत ८०० विशेष गाड्यांमधून साडे अकरा लाख परप्रांतीय त्यांच्या गावी गेले आहेत. राज्यातून परराज्यांत जाणारे अनेक मजूर परतीचा प्रवास रद्द करत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या मदतीसाठी पुरवण्यात आलेल्या दीड हजार मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना ३१ मेपासून पुन्हा त्यांच्या जुन्या ठिकाणी रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यात आतापर्यंत ८०० रेल्वेतून ११ लाख ५० हजार परप्रांतीय आपापल्या गावी गेले आहेत. फक्त पश्चिम बंगालमध्ये जाणाऱ्या गाड्या सध्या बाकी आहेत. तेथे वादळ आल्यामुळे या गाड्या प्रलंबित राहिल्या होत्या. पश्चिम बंगालमधील बहुसंख्य नागरिक रविवारी रवाना होतील, पण नव्या नोंदणीची संख्या घटली आहे. गुरुवारी ११ गाड्या विविध राज्यांत जाणार होत्या, पण अनेक कामगारांनी परतीचा प्रवास रद्द केल्यामुळे फक्त तीन गाड्या सोडण्यात आल्या, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे १४२१ कर्मचारी पुन्हा जुन्या ठिकाणी रुजू होतील. विद्यापीठांच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत 'हे' निर्देश... सुमारे ९४ कोटींहून अधिक खर्च परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात सुखरूप परत जाता यावे, यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शुक्रवारी (ता.२९) पर्यंत ४१ हजार ८७४ बस फेऱ्यांच्या माध्यमातून ५ लाख ८ हजार ८०३ स्थलांतरितांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत किंवा नजीकच्या रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्यात आले. यासाठी सरकारने १०० टक्के निधी उपलब्ध करून दिला असून, आतापर्यंत ९४.६६ कोटी रुपये यावर खर्च करण्यात आला आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates May 30, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3gwuplY Read More Read more No comments:
Video : शहरी जीवनाला निसर्गाशी जोडणारी आर्किटेक्ट कल्याणी कुलकर्णी ही आर्किटेक्ट तरुणी अर्बन डिझाईन, डिजिटल आर्किटेक्चर व प्रॉडक्ट डिझाईन अशा नव्या माध्यमातून शहरी नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात आणू पाहते आहे. लंडनला मास्टर्स डिग्री घेऊन, तिथल्या एका नामांकित संस्थेत नोकरीची उत्तम संधी मिळत असतानाही ती भारतात परतली. कल्याणी तिची चित्रं टाकाऊ कार्डबोर्ड, उरलेले कागद, काच अशा माध्यमांवर साकारते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा लंडनमध्ये राहण्याचं स्वप्नं अनेक तरुणांना पडत असताना कल्याणीने मात्र तेथील नोकरीची चालून आलेली संधी सहज नाकारली. मात्र, आर्किटेक्ट होण्यासाठी तेथील सर्वोत्कृष्ट अभ्यासक्रम आत्मसात केला. एका संस्थेत वर्षभर कार्यानुभव घेतला. हे ज्ञान आपल्या शहरासाठी उपयोगात आणावं म्हणून ती पुण्यात परतली. ती म्हणाली, ‘‘शहरांचा विकास होताना त्यात निसर्गाला महत्त्वाचं स्थान असलं पाहिजे. महानगरी जीवन आणि निसर्ग यांच्यात दुवा ठरणारी कामं करता यावीत, हा ध्यास मला जडला आहे. तो माझ्या चित्रांमधूनही डोकावतो. वास्तविक आर्किटेक्ट या नात्याने चित्रं काढली जातात, ती समोर दिसलेलं काही नोंदून ठेवण्यासाठी किंवा सुचलेली कल्पना टिपून ठेवण्यासाठी. मात्र कामाच्या प्रक्रियेचा एक भाग असलेल्या रेखाकृती, या पलीकडे जाऊन रम्य कल्पनांनी भारलेली चित्रं मी काढत राहते. कॅनव्हासऐवजी माझी चित्रं पॅकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या कार्डबोर्ड, पुठ्ठा आणि ऑफिसच्या स्टेशनरीतून उरलेले वेगवेगळ्या प्रकारचे कागदांवर असतात. त्या साहित्याच्या अंगभूत पोतामुळे निराळा परिणाम साधला जातो. मी काचांवर कीटकांची चित्रं काढली. भिंतीवर लावल्यानंतर सावलीमुळे ‘थ्री डी’ इफेक्टची गंमत साधता आली.’’ कल्याणीने असंही सांगितलं की, ॲल्युमिनिअम फॉइलला आकार देऊन छोटी शिल्पं करून पाहते आहे. माझ्या संकल्पना व आरेखनातून धातुशिल्पं साकारली आहेत. यांपैकी काही वनदेवी टेकडीवर बघायला मिळतील. पर्यावरण पर्यटनाला चालना देण्यासाठी पुणे वनविभागाच्या समितीत मी आहे. आर्किटेक्ट व शहरी आरेखनकार या नात्याने माझ्या संकल्पना व आरेखनातून पंचतंत्रातील कथांवर आधारित ही शिल्पं आहेत. या कामांसाठी मी आणि कौशिक सरदेसाई याने अँथेम ही फर्म आणि स्टुडिओ सुरू केला. आम्ही आयुष्यातही जोडीदार होऊन आता शहराच्या विकासकामांमध्ये निसर्गाला एकरूप करण्याचं स्वप्न पाहत आहोत. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates May 30, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2zNPYxP Read More Read more No comments:
JK: अनंतनाग में सुरक्षाबलों और आतंकियों के बीच एनकाउंटर जारी https://ift.tt/2XOvVHy Latest news updates May 30, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
सरकार 2.0 का एक साल-निर्विवाद नेता, कमजोर विपक्ष और मजबूत होता गया ब्रैंड मोदी https://ift.tt/2TTITCN Latest news updates May 29, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
मोदी सरकार 2.0 का एक साल, डिजिटल जश्न मनाएगी BJP, नड्डा देंगे भाषण https://ift.tt/36K4F14 Latest news updates May 29, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
इस डायरेक्टर के नाम है 12 नेशनल अवॉर्ड्स, बनाई समलैंगिकता पर फिल्में https://ift.tt/2M9fujR Latest news updates May 29, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments: